संसदेबाहेर नेमकं काय घडलं ज्यामुळे कंगना राणौतचा (Kangana Ranaut) पारा अचानक चढला? पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज ठप्प झाले असताना, भाजप खासदार कंगना राणौतने ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP Protest) आंदोलनावर थेट आणि आक्रमक शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
दिल्लीत आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला चांगलीच वादळी सुरुवात झाली. NEET-UG 2026 परीक्षेतील गोंधळ आणि अयोध्येतील जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांवरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याच गदारोळावर प्रतिक्रिया देताना Kangana Ranaut हिने आंदोलकांना चांगलेच सुनावले असून राजकारण तापले आहे.
Kangana Ranaut on CJP Protest
संसद भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना कंगनाने आपला संताप अजिबात लपवला नाही. “जनतेने ज्या सरकारला निवडून दिले आहे, ते सरकार कसे चालवायचे हा आमचा पूर्ण अधिकार आहे,” अशा शब्दांत तिने विरोधकांवर थेट निशाणा साधला.
विरोधकांच्या दबावाच्या राजकारणावरही तिने जोरदार हल्लाबोल केला. “कुणाला ठेवायचे आणि कुणाला पदावरून काढायचे, यासाठी तुम्ही सरकारवर दबाव टाकू शकत नाही. हे एक प्रकारे सरकारचे हात पिरगळण्यासारखे आहे आणि ते अजिबात योग्य नाही,” असा थेट इशाराच कंगनाने दिला.
पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालावे आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी आपली इच्छा असल्याचे तिने स्पष्ट केले. मात्र, विरोधकांच्या सततच्या गदारोळामुळे आणि घोषणाबाजीमुळे आज दुपारी १२ वाजेच्या सुमारासच लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधक या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत असल्याने येत्या काळात संसदेतील खडाजंगी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “माझ्या हृदयाचे ठोके १० मिनिटांसाठी थांबले होते”; श्रेयस तळपदेने सांगितला थरारक अनुभव
- “सरकार पोरांना घाबरलंय, ’56 इंचवाल्यांची हातभर फाटली”; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत गोंधळ; ‘चलो संसद’ आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज













