🕒 1 min read
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर जे घडलं, ते पाहून पाकिस्तानची (Pakistan) बोलती बंद झालीये. भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) सामना म्हटलं की, मैदानात ठिणगी पडणार हे नक्कीच असतं. पण आज टॉसच्या वेळीच भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जे केलं, त्याची चर्चा आता जगभरात सुरू झालीये.
टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या (T20 World Cup 2026) या महामुकाबल्यात भारताने आपली ‘नो हँडशेक पॉलिसी’ (No Handshake Policy) पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली. नाणीफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाशी (Salman Agha) साधं हस्तांदोलनही केलं नाही.
Ind vs Pak Toss
थेट आपल्या देहबोलीतून त्याने “आम्ही इथे मैत्री करायला नाही, तर हिशोब चुकता करायला आलोय,” असा कडक संदेश दिला. विशेष म्हणजे, आयसीसीच्या स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलंय. आशिया कप २०२५ मध्ये सुरू झालेला हा सिलसिला आजही कायम आहे.
कालच्या पत्रकार परिषदेतच सूर्याने याचे संकेत दिले होते. “यासाठी उद्यापर्यंत वाट पाहा,” असं तो म्हणाला होता आणि आज त्याने ते करून दाखवलं. दरम्यान, पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली खरी, पण सूर्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास जराही ढळला नाही. “आम्हाला आधी बॅटिंग करायला काहीच हरकत नाही, उलट आम्हाला हेच हवं होतं. आम्ही धावसंख्या वाचवण्यात (Defend) माहीर आहोत,” असं सांगत त्याने पाकिस्तानवर उलट मानसिक दडपण टाकलंय.
संघामध्येही दोन मोठे बदल झालेत. दुखापतीतून सावरलेला अभिषेक शर्मा पुन्हा टीममध्ये आलाय. तर खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्याने अर्शदीपच्या जागी ‘चायनामन’ कुलदीप यादवला संधी दिलीये. आता भारताचा हा ‘अटॅकिंग मोड’ पाकिस्तानला किती महागात पडतो, हे पाहणं थरारक ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राजपाल यादव १० दिवसांत जेलबाहेर? सलमानने फिरवली ‘ती’ चक्रं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
- प्रत्येक पिवळ सोनं नाही… तुम्ही खरेदी करताय ते सोने-चांदी किती शुद्ध? ‘हा’ ॲप डाऊनलोड करा, घरबसल्या चेक करा
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं शेतात फोटोशूट; ओळखणंही झालं कठीण, पाहून नेटकरी फिदा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











