🕒 1 min read
‘भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना होणार की नाही?’ या एका प्रश्नाने गेल्या काही दिवसांपासून जगभरातील क्रिकेटप्रेमींचा जीव टांगणीला लावला होता. पण आता चाहत्यांसाठी एक मोठी ‘गुड न्यूज’ समोर आली आहे. सर्व बाजूला सारत अखेर या महामुकाबल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
T20 World Cup 2026 च्या थरारात आता खरी रंगत येणार आहे. कारण, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) येत्या 15 फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. हा सामना झाला नसता तर प्रायोजक आणि ब्रॉडकास्टर्सचं कोट्यवधींचं नुकसान झालं असतं, त्यामुळे आयसीसी आणि पीसीबीमध्ये जोरदार खलबतं सुरू होती.
IND vs PAK T20 WC
लाहोरमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आयसीसी (ICC) अधिकाऱ्यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. पाकिस्तानने काही अटींसह खेळायला होकार दिला आहे. या बैठकीत बांगलादेश आणि पाकिस्तानच्या मागण्यांवर चर्चा झाली. बांगलादेशला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं होतं, त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून त्यांना अंडर-19 किंवा महिला वर्ल्ड कपच्या यजमानपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानने पैशांचा मुद्दा लावून धरला होता. आयसीसीच्या उत्पन्नातील वाटा (सध्या 5.75% म्हणजे 34-35 दशलक्ष डॉलर) वाढवण्याची मागणी पीसीबीने केली आहे, ज्यावर विचार करण्याचं आश्वासन आयसीसीने दिलं आहे. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतासोबत द्विपक्षीय मालिकेचा (Bilateral Series) राग आळवला होता. पण आयसीसीने ही मागणी थेट फेटाळून लावली आहे. “हे प्रकरण आमच्या कार्यकक्षेत येत नाही,” असं आयसीसीने स्पष्ट केलंय. त्यामुळे 2012 नंतर बंद झालेली ही मालिका तूर्तास तरी सुरू होण्याची चिन्हं नाहीत.
📌 महत्वाच्या बातम्या
- सैफ अली खानने अमृता सिंगवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला होता? सत्य आलं समोर!
- अदनान सामीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; मोहन भागवतांच्या भेटीनंतर केला मोठा गौप्यस्फोट!
- “भारताने हे करावं, तरच खेळणार”; पाकिस्तानने ICC समोर ठेवल्या 3 अटी, ‘ही’ मागणी पूर्ण होणं अशक्य!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











