🕒 1 min read
“मैदानात विजय मिळवला, पण खेळभावना हरली का?” सध्या क्रिकेटविश्वात हा एकच प्रश्न चर्चिला जातोय. टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) ६१ धावांनी धूळ चारली, पण सामन्याच्या निकालापेक्षा जास्त चर्चा टीम इंडियाच्या ‘नो हँडशेक’ (No Handshake) पॉलिसीची आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका व्हिडिओची होत आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर जे घडलं, त्याने सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत.
एकीकडे भारतीय संघाने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास स्पष्ट नकार दिला (ही प्रथा आशिया कप २०२५ पासून सुरू आहे), तर दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार आणि या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र वेगळ्याच मूडमध्ये दिसला.
Rohit Sharma Hugs Wasim Akram
सामन्यापूर्वी रोहितने ट्रॉफी मैदानात आणली, तेव्हा तिथे पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) उपस्थित होता. रोहितने वसीमला पाहताच त्याला घट्ट मिठी मारली (Hugging), हसून गप्पा मारल्या. दोघांच्या या मैत्रीपूर्ण गळाभेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
रोहित आणि वसीम यांच्यात एवढं सख्य असू शकतं, तर सध्याच्या भारतीय संघाला हँडशेक करायला काय हरकत आहे? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. या दुहेरी भूमिकेवरून क्रिकेट वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या प्रकारावर समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “क्रिकेट आता खेळापेक्षा जास्त राजकीय अजेंड्याचा भाग बनत चालला आहे. पूर्वीसारखा तो भावनिक ओलावा आता राहिला नाही.” तर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी तर थेट टीम इंडियाला सुनावले आहे. “ही ‘नो हँडशेक’ पद्धत भारताला शोभत नाही. खेळभावनेने खेळा, नाहीतर खेळूच नका,” अशा कडक शब्दांत त्यांनी कानउघाडणी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘रात्रीस खेळ चाले’ फेम ‘शेवंता’चं गुपचूप दुसरं लग्न! ८ वर्षांच्या संसारानंतर शिवसेनेच्या नेत्याला का सोडलं? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
- PM Modi Interview: ‘फक्त नफ्यामागे धावू नका…’; मोदींचा बड्या कंपन्यांना कडक संदेश, नेमकं काय म्हणाले?
- IND vs PAK: भारताने ‘अब्रू’ काढली; पाकिस्तानचे हाल पाहवेना म्हणून PCB प्रमुखांनी सामना संपण्याआधीच काढला पळ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











