🕒 1 min read
भारत-पाकिस्तान सामना (Ind vs Pak Match) म्हटलं की अंगावर काटा येतो, रस्त्यावर शुकशुकाट होतो आणि प्रत्येक चेंडूगणिक हृदयाची धडधड वाढते… किंवा निदान काही वर्षांपूर्वी तरी असंच चित्र असायचं. पण ज्यांचा आवाज ऐकून आपण क्रिकेट समजून घेत लहानाचे मोठे झालो, त्या प्रख्यात समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी आता या सामन्याच्या सध्याच्या परिस्थितीवर अत्यंत कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “आता मला या सामन्याबद्दल पूर्वीसारखा उत्साह वाटत नाही,” असं म्हणत त्यांनी क्रिकेट चाहत्यांच्या वर्मावर बोट ठेवलंय.
जुने दिवस आठवत भोगले म्हणाले, “पूर्वी मनात नेहमीच एक अनामिक भीती आणि धडधड असायची. आशा-निराशेचा तो खेळ थरारक असायचा. पण आता? आता या खेळाला पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलंय.” सध्या टीव्हीवर चालणारे ‘युद्धासारखे प्रोमोज’ (War-like promos) आणि अति-व्यावसायीकरण पाहून खेळाचा आनंद घेण्यापेक्षा त्याचं ‘शोषण’ (Exploitation) होत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. हा सामना आता फक्त भू-राजकीय (Geopolitical) फायद्यासाठी वापरला जाणारा एक ‘बाण’ झाला आहे, अशी सडेतोड टीका त्यांनी केली आहे.
Harsha Bhogle Statement
मैदानावरील गणितावर बोलताना भोगले यांनी स्पष्ट केलं की, राजकीय तणावामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर प्रचंड दडपण असेल. “मैदानात उतरल्यावर ते हे सगळं विसरू शकतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल,” असं ते म्हणाले.
तर भारतीय संघासाठी त्यांनी तरुण तडाखेबाज अभिषेक शर्माला ‘कळीचा खेळाडू’ मानलं आहे. “जर अभिषेक पॉवरप्ले संपेपर्यंत टिकला, तर सामना भारताच्या बाजूने झुकलेला असेल,” असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे. हर्षा भोगलेंच्या या विधानामुळे क्रिकेट विश्वात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Ind vs Pak: ईशान किशनचं वादळ; पाकिस्तानला घाम फोडला, पण ‘त्या’ एका चुकीने शतक हुकलं
- Ind vs Pak: टॉसच्या वेळी सूर्यकुमारचा ‘तो’ रुद्रावतार; सूर्यकुमार यादवने नेमकं काय केलं?
- राजपाल यादव १० दिवसांत जेलबाहेर? सलमानने फिरवली ‘ती’ चक्रं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










