दिल्ली– एका केंद्रीय मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार विद्यार्थ्यांच्या रक्ताची होळी खेळायला तयार आहे का? असा संतप्त सवाल आता राजधानीतून विचारला जाऊ लागला आहे.
दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या आंदोलनादरम्यान पुरुष पोलिसांनी विद्यार्थिनींना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलक विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागितली आहे.
धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांवर हल्ले?
“ज्या मुलींना पुरुष पोलिसांनी बेदम मारहाण केली, त्यांची मी माफी मागतो. दिल्ली पोलिसांच्या या अमानवीय कारवाईपासून मी तुम्हाला वाचवू शकलो नाही, याची मला खंत आहे,” अशा भावनिक शब्दांत अभिजित दिपके (Abhijeet Dipke) यांनी आपल्या भावना मांडल्या.
२० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी हे सरकार आणखी तरुणांचे रक्त सांडायला तयार असल्याचे दिपके म्हणाले.
दुसरीकडे, या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट मेसेज करून (DM) संपर्क साधावा, मी स्वतः बोलून माफी मागेन, असे आवाहन त्यांनी केले. आपण हा लढा इथून पुढेही असाच सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुणे हादरलं! तरुणीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; कोणत्या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ आणि ‘येलो अलर्ट’?
- ‘सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपला’; दिल्लीतील लाठीचार्जवर सुप्रिया सुळेंचा संताप













