Monday - 25th September 2023 - 8:28 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Uddhav Thackeray | सत्ता येताच मंडळींनी ‘ईव्हीएम’ची पूजा सुरू केलीय; ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

The opposition is alleging that BJP is getting the success because of EVM setting

by Mayuri Deshmukh
26 August 2023
Reading Time: 1 min read
The Thackeray group criticized the Modi government over the EVM scam

भारतीय जनता पक्षाला 2014 पासून निवडणुकांमध्ये घवघवीत यश प्राप्त होत आहे. मात्र, भाजपला हे यश ईव्हीएम सेटिंग असल्यामुळे मिळत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे घटना भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

Share on FacebookShare on Twitter

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पक्षाला 2014 पासून निवडणुकांमध्ये घवघवीत यश प्राप्त होत आहे. मात्र, भाजपला हे यश ईव्हीएम सेटिंग असल्यामुळं मिळत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सत्यमेव जयते’ हेच आपल्या देशाचे बोधवाक्य आहे. सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते लाव्हाप्रमाणे उसळून वर येतेच.

भाजपच्या वॉशिंग मशीनमधील मोदी साबणाची चर्चा जगभर सुरू आहे. त्यात भर घातली आहे ती भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी त्यांनी बेशकपणे, निर्भयपणे सांगितले की, “मतदारहो तुम्ही कोणतेही बटन दाबा, मत भाजपलाच जाणार आएगा तो मोदी ही…” याचा सरळ अर्थ असा की भाजप ‘ईव्हीएम’ घोटाळा करून लोकसभा निवडणुका जिंकत आहे, असं आजच सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

भारतात निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे सावट आहे. मेघालयातील बोलोंग संगमा या तरुणास नुकतीच अटक झाली. का? तर ‘ईव्हीएममध्ये सेटिंग करून प्रत्येक मत फक्त भाजपलाच कसे जाते याबाबतचा एक व्हिडीओ तयार करून त्याने प्रसारित केला.

‘ईव्हीएम’द्वारे घेतलेल्या पोटाळा घोटाळा असल्याचे त्याने सिद्ध करताच त्या भारतीय नागरिकास अटक केली. प्रश्न इतकाच आहे की, आता भाजपचेच खासदार डी. अरविंद कुमार यांनीही तेच सत्य सांगितले! त्यांचे हे सत्यकथन म्हणजे ‘ईव्हीएम घोटाळ्यावर शिक्काच आहे मग आता काय करणार? अरविंद कुमारना ‘ईव्हीएम घोटाळयाचा ब्रॅण्ड अम्बेसेडर बनवा. त्यांनी सत्य, सत्य आणि सत्य सांगितले आहे.

‘सत्यमेव जयते’ हेच आपल्या देशाचे बोधवाक्य आहे. सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते लाव्हाप्रमाणे उसळून वर येतेच. भाजपच्या वॉशिंग मशीनमधील मोदी साबणाची चर्चा जगभर सुरू आहे.

त्यात भर घातली आहे ती भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी त्यांनी बेशकपणे, निर्भयपणे सांगितले की, “मतदारहो तुम्ही कोणतेही बटन दाबा, मत भाजपलाच जाणार आएगा तो मोदी ही…” याचा सरळ अर्थ असा की भाजप ‘ईव्हीएम’ घोटाळा करून लोकसभा निवडणुका जिंकत आहे.

‘ईव्हीएम’ हॅक करून विजय संपादन करणे हेच भाजपचे सूत्र असल्याचे भाजपचे खासदार सांगत असतील तर भारताचा निवडणूक आयोग यावर काय पावले उचलणार आहे?

खरे तर निवडणूक आयोगाकडूनही आता कोणत्याच अपेक्षा ठेवता येणार नाहीत कारण ‘ईव्हीएम’बरोबर सत्तापक्षाने निवडणूक आयोगलाच ‘हक’ केले आहे. निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही भाजपच्या केंद्रीय सरकारचा तो हरकाम्या बनला आहे.

निवडणूक आयोगात ‘गुजरात मॉडेलचे अधिकारी आणून त्यांच्याकडून हवी ती बरी वाईट कामे करून घेतली जातात महाराष्ट्रात ज्या प्रकारे शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाच्या हातात दिले.

त्यामुळे या मनमानीवर शिक्कामोर्तब झाले सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी एका समितीचे गठन केले यात पंतप्रधान विरोधी पक्षनेते व सरन्यायाधीशांचा समावेश होता हा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा केराच्या टोपलीत टाकून सरकारने निवडणूक आयुक्त निवड समितीवरून सरन्यायाधीशांनाच हटवले.

न्या. चंद्रचूड यांचा स्वाभिमानी बाणा निवडणूक आयोगाला परवडणारा नसावा व आयोगावर कळसूत्री बाहुली बसविण्यास न्या. चंद्रचूड यांनी विरोध केला असता.

दुसरी गंमत अशी की, भारतीय जनता पक्षाचे आज ‘ईव्हीएम’वरचे प्रेम उतू चालले आहे, पण ‘ईव्हीएम’ सुरक्षित नाही व मशीनमध्ये सेटिंग करून गोलमाल करता येतो हा पुराव्यासह शोध भाजपनेच लावला.

भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तर ‘ईव्हीएम घोटाळयावर एक ग्रंथ लिहून ‘ईव्हीएम’विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भाजपचे गुलुंडकर नागडे पोपटलालही घटन करीत होते, पण 2014 साली सता येताच या मंडळींनी ‘ईव्हीएमची पूजा व उत्सव सुरू केला.

‘ईव्हीएम है तो मोदी ही आयेगा’ यावर मोहोर उठवून देशभरातील अंधभक्तांनी ‘ईव्हीएम चालिसा पठण सुरू केले अमेरिका, युरोप, जपान, जर्मनी, बांगलादेश, फ्रान्ससारख्या राष्ट्रांनी तेथील निवडणूक प्रक्रियेतून ‘ईव्हीएम’ पद्धत मोडीत काढली.

‘ईव्हीएम’ विश्वासार्ह व समाधानकारक नाही हे सिद्ध झाल्यावरच हा निर्णय जेतला, पण विश्वासार्ह नसलेल्या ‘ईव्हीएम’ जनतेचा विश्वास गमावलेल्या मोदी सरकारने सुरूच ठेवल्या.

हेच खरे गौडबंगाल आहे व हा भंगार माल का वापरला जातोय ते भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी आता स्पष्ट केले. आता भाजपचे अंडा’ भक्त नेहमीचाच दावा करतील की, ईव्हीएमचा घोटाळा असेल तर अनेक राज्यांतील विधानसभांत भाजपचा पराभव होऊन विरोधकांची सत्ता का आली? ते ईव्हीएम हॅक का करण्यात आले नाहीत? हा साळसूदपणाचा प्रश्न म्हणजेच घोटाळा आहे.

मोदी शहांना राज्यातील सत्तेत इंटरेस्ट नाही, पण लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचा ‘खेला’ करून दिल्लीची सत्ता ताब्यात घ्यायची व त्या सत्तेच्या बळावर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना टाचेखाली ठेवायचे केंद्रीय तपास यंत्रणा, निवडणूक आयोग, न्याय यंत्रणा यांच्या माध्यमातून राज्याराज्यांत धुमाकूळ घालायचा हे त्यांचे सूत्र आहे. ईव्हीएमचा घोटाळा फक्त लोकसभा जिंकण्यासाठी असे एकंदरीत सूत्र

ठरलेले आहे व त्यानुसारच सगळे काही चालले आहे. निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे घ्याव्यात अशी मागणी देशातील सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सातत्याने करीत आहेत.

‘ईव्हीएममधून दिलेले मत नक्की कोणाला जाते हा संशय मतदारांच्या मनात असेल तर तो लोकशाहीचा पराभव आहे. निदानपक्षी बटन दाबल्यावर त्यातून आपण दिलेल्या मताचे चिन्ह बाहेर पडावे व समाधान झाल्यावर तो कागद पेटीत टाकावा, या मागणीवरही सरकार चालढकल करीत आहे.

आपण ज्यास मत दिले ते त्या उमेदवारास गेले की नाही, या शंकेचे निरसन निवडणूक आयोग करू शकत नसेल तर या भाजपाई बोलक्या बाहुल्यांचा देशाला उपयोग नाही.

निवडणूक आयोगाचे कार्यालय भाजप कार्यालयात हलवलेले बरे. भाजपचा एक खासदार ‘ईव्हीएम’ घोटाळयाची कबुली देतोय, तरीही देशाचा निवडणूक आयोग थंडपणे हे सहन करीत आहे.

आज टी. एन. शेषन असते तर त्यांनी ‘ईव्हीएमच्या गोडाऊनवर बुलडोझरच फिरवला असता व लोकशाहीचे रक्षण केले असते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे सावट आहे.

मेघालयाच्या गारो हिल्स जिल्ह्यातील बोलोंग संगमा या तरुणास नुकतीच अटक झाली. का? तर मध्ये सेटिंग करून प्रत्येक मत फक्त भाजपलाच कसे जाते याबाबतचा एक व्हिडीओ तयार करून त्याने प्रसारित केला.

‘ईव्हीएम’द्वारे घेतलेल्या निवडणुकांत घोटाळाच घोटाळा असल्याचे त्याने सिद्ध करताच त्या भारतीय नागरिकास अटक केली. प्रश्न इतकाच आहे की, आता भाजपचेच खासदार डी. अरविंद कुमार यांनीही तेच सत्य सांगितले!

त्यांचे हे सत्यकथन म्हणजे ‘ईव्हीएम’ घोटाळ्यावर शिक्काच आहे! मग आता काय करणार? अरविंद कुमारना ‘ईव्हीएम’ घोटाळयाचा ब्रॅण्ड अम्बेसेडर बनवा. त्यांनी सत्य, सत्य आणि सत्य सांगितले आहे.

सौजन्य – सामना

महत्वाच्या बातम्या

  • Narendra Modi | 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार – नरेंद्र मोदी
  • Supriya Sule | अजित पवारांवर कारवाई करणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
  • Supriya Sule | अजित पवारांचं नेतृत्व मान्य आहे? सुप्रिया सुळे म्हणतात…
  • Sanjay Raut | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली आहे – संजय राऊत
  • Ajit Pawar | मला त्या विषयावर बोलायचं नाही; शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
SendShare24Tweet15Share
Previous Post

Narendra Modi | 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार – नरेंद्र मोदी

Next Post

Sharad Pawar | काही आमदार बाजूला गेले म्हणजे पक्षात फूट पडत नाही – शरद पवार

जॉईन WhatsApp ग्रुप

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS mhd news whatsapp no

Google News वर Follow करा

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS

महत्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar criticizes Eknath Shinde and Devendra Fadnavis over Amit Shah's Mumbai visit
Editor Choice

Vijay Wadettiwar | केंद्रीय मंत्री आल्यावर सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं नाही; वडेट्टीवारांची शिंदे-फडणवीसांवर टीका

Eknath Shinde will remain Chief Minister said Sanjay Shirsat
Editor Choice

Sanjay Shirsat | एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहतील – संजय शिरसाट

Satyajit Tambe has reacted to the move to close Zilla Parishad schools
Editor Choice

Satyajeet Tambe | शिक्षण विभाग काही प्रयोगशाळा नाही; सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया

Ashish Shelar has reacted to the demand made by Vijay Vadettiwar on MLA disqualification
Editor Choice

Ashish Shelar | विजय वडेट्टीवार आहे तरी कोण? – आशिष शेलार

NEWSLINK

Vijay Wadettiwar | शिवसेना आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे व्हावी – विजय वडेट्टीवार

Rahul Narwekar | आमदार अपात्रतेबाबत घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्षांनी दिले मोठे संकेत

Sanjay Raut | ठाकरे गट नाही, शिवसेना म्हणा; संजय राऊत संतापले

Uddhav Thackeray | भाजपची सनातन धर्म विषयाची चिंता पोकळ; ठाकरे गटाची भाजपवर टीका

Amol Mitkari | भाजप- अजित पवार गटात वाद पेटला; पडळकरांच्या वक्तव्यावर मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया

Rahul Narwekar | आमदार अपात्रता प्रकरणाचा लवकरच निकल लागणार? विधानसभा अध्यक्ष तातडीने दिल्लीला रवाना

Bacchu Kadu | CM शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील – बच्चू कडू

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • जीवनमान
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In