🕒 1 min read
मैदानात पाकिस्तानला लोळवल्यानंतर खरी चर्चा रंगली ती सोशल मीडियावर. भारताने ६१ धावांनी सामना जिंकला हे तर खरंच, पण त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जे केलं, त्याने इंटरनेटचा पारा चढलाय. विजयाच्या जल्लोषात सूर्याने इन्स्टाग्रामवर टाकलेली एक पोस्ट सध्या पाकिस्तानच्या पराभवापेक्षा जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे.
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानचा पुरता धुव्वा उडवल्यानंतर, ड्रेसिंग रूममधील सेलिब्रेशनचे फोटो सूर्याने शेअर केले. पण फोटोपेक्षा लक्ष वेधलं ते त्याच्या कॅप्शनने.
Suryakumar Yadav Post
सूर्याने केवळ ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) असे तीन शब्द लिहित विजयाचा आनंद व्यक्त केला. या तीन शब्दांनी भारतीय चाहत्यांची मनं जिंकली, तर काहींच्या मते हे पाकिस्तानसाठी एक कडक ‘सायलेंट’ उत्तर होतं. या पोस्टवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढली. ईशान किशनने ७७ धावांची आक्रमक खेळी करत भारताला १७५ धावांपर्यंत नेलं. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारताने उभारलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. टिळक वर्मा आणि रिंकू सिंगनेही मोलाची साथ दिली.
१७६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची दाणादाण उडाली. बुमराह आणि हार्दिक पांड्याने सुरुवातीलाच धक्का दिल्याने पाकिस्तानचा डाव अवघ्या ११४ धावांत संपुष्टात आला. सामन्यानंतर बोलताना सूर्या म्हणाला, “या खेळपट्टीवर १५५ धावा पुरेशा होत्या, पण आम्ही १७५ केल्याने सामना तिथेच जिंकलो होतो.” ईशानच्या खेळीचंही त्याने भरभरून कौतुक केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs PAK : एकीकडे ‘नो हँडशेक’, तर दुसरीकडे रोहितने काय केलं? वसीम अक्रमला पाहताच…..
- ‘रात्रीस खेळ चाले’ फेम ‘शेवंता’चं गुपचूप दुसरं लग्न! ८ वर्षांच्या संसारानंतर शिवसेनेच्या नेत्याला का सोडलं? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
- PM Modi Interview: ‘फक्त नफ्यामागे धावू नका…’; मोदींचा बड्या कंपन्यांना कडक संदेश, नेमकं काय म्हणाले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











