Share

शिवसेना कोणाची? अंतिम युक्तिवादासाठी दोन्ही गट सज्ज, पण सुप्रीम कोर्टाचा नवा ट्विस्ट!

शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी सज्ज झाले आहेत. पुढची तारीख लवकरच ठरेल.

Published On: 

Shivsena Hearing in Supreme Court Eknath Shinde and Uddhav Thackeray dispute

पुणे – राजकारणात कधी काय होईल आणि कोर्टाचा निकाल कधी येईल, याचा नेमका अंदाज कुणालाच बांधता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या शिवसेना आणि धनुष्यबाण वादात आता पुन्हा एकदा पुढची तारीख मिळाली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आता ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी अंतिम युक्तिवादासाठी आम्ही पूर्णपणे तयार असल्याचं कोर्टाला सांगितलं आहे.

असं असलं तरी, कोर्टाने अद्याप सुनावणीची पुढची तारीख निश्चित केलेली नाही. दोन्ही बाजूंचे लेखी युक्तिवाद वाचून आणि वेळेच्या उपलब्धतेनुसारच पुढील सुनावणीची तारीख दिली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्यातरी दोन्ही गटांना वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.

Shivsena Hearing Supreme Court Status

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड पुकारलं आणि राज्यात मोठी खळबळ उडाली. बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे यांनी भाजपच्या साथीनं नवं सरकार स्थापन केलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिवसेना हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे मूळ चिन्ह थेट शिंदे गटाला बहाल केलं. या अनपेक्षित निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ हे नवीन चिन्ह देण्यात आलं.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने फेब्रुवारी २०२३ मध्येच सुप्रीम कोर्टात धाव घेतली. खरी शिवसेना कुणाची, यावर कोर्टात तेव्हापासून सातत्याने घमासान सुरू आहे. पक्षाची मूळ ओळख ही धनुष्यबाण चिन्हाशी जोडलेली असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला थेट स्थगिती दिली नसली तरी, अंतिम निकाल येईपर्यंतच शिंदे गटाला या चिन्हाचा वापर करता येणार आहे.

मे २०२५ मध्ये झालेल्या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी तातडीचा निकाल देण्यास कोर्टाने स्पष्ट नकार दिला होता. त्यावेळी ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणाचा दाखला देत कोर्टाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. आता अंतिम युक्तिवादानंतर या सत्तासंघर्षाचा काय निकाल लागतो, याचीच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही