Rakhi Sawant | प्रेमात पुन्हा धोका मिळाल्यानंतर राखी सावंत म्हणाली, “मी मरून…”

Rakhi Sawant | मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यानंतर राखीने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. हे व्हिडिओ बघून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केले होते. या दोघांनी आधी कोर्टामध्ये लग्न केले आणि नंतर निकाह केला होता. मात्र, आता राखीच्या लग्नाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राखी सावंतला पुन्हा एकदा प्रेमात धोका मिळाला आहे. “मी हे लग्न नाकारू नाही आणि स्वीकारू शकत नाही. मी खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये हे लग्न केलं आहे.” असं विधान आदिलने केलं आहे. आदिलने राखी सोबतच्या लग्नाला नकार दिला आहे.

सोशल मीडियावर राखी सावंतचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी तिच्या मैत्रिणीसोबत दिसली आहे. या व्हिडिओमध्ये तिची मैत्रीण तिला लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. या शुभेच्छांना उत्तर देत राखी म्हणाली, “माझं लग्न झालं आहे. परंतु, माझा नवरा पळून गेला आहे. आम्ही कोर्टात लग्न केले आणि मग निकाह केला. इतकेच नाही तर मी माझे नाव देखील बदलले आहे. मात्र, आता आदिल लग्न स्वीकारायला नकार देत आहे.” एक काम कर, समोरून जो ट्रक येत आहे त्याच्यासमोर मला धक्का मार..मी मरून जाते.. कारण माझे नशीब खूप खराब आहे, असं देखील राखी यावेळी म्हणाली.

राखी सावंतने 2019 मध्ये रितेश सोबत लग्न केलं होतं. हे दोघेजण बिग बॉसमध्ये झळकले होते. 2022 मध्ये हे दोघे वेगळे झाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राखीने तिच्या आणि आदिलच्या लग्नाबद्दल माहिती दिली होती. तिने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र, आता आदिल या लग्नाला नकार देत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.