🕒 1 min read
Manikrao Kokate । कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी पीक विमा योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. अशातच आता त्यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे.
नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे तसेच त्यांना ५० हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे. त्यांच्यावर १९९५ मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आला होता.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार कोकाटे यांच्यावर भादवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल केला होता. आज याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली.
या सुनावणीदरम्यान न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाउ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यामुळे कोकाटे यांच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाच्या निकालावरून अनेक ठिकाणी कोकाटे यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. परंतु, विरोधक याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची आणि सरकारची कोंडी करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde यांची गाडी बॉम्बने उडवणार, धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
- कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयावर Manikrao Kokate यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “राजकीय वैरातून माझ्यावर..”
- Dhananjay Munde यांनी डावलला अजित पवारांचा आदेश, अनेकदा सांगूनही ‘ते’ काम केलेच नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










