ESIS | महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
ESIS | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (Employee State Insurance Scheme) अंतर्गत कोल्हापूर येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेल द्वारे आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIS) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये वैद्यकारी अधिकारी पदाच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (ESIS) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (ESIS) इच्छुक उमेदवारांना दिनांक 18 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. तर या भरती प्रक्रियेतील मुलाखतीसाठी उमेदवारांना दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416003.
अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)
kolhapur.amo@gmail.com
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416003.
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.maharashtra.gov.in/1125/Home
महत्वाच्या बातम्या
- IPL 2023 | पराभवानंतर KKR ला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू संघातून बाहेर?
- Bombay High Court | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू
- Sanjay Raut | “जवानांची पुलवामात हत्या केली आणि नंतर त्याच राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात” : संजय राऊत
- Satya Pal Malik | “मी पंतप्रधान मोदींना सांगितलं पुलवामा हल्ला आपल्याच चुकीमुळे झालाय, पण त्यांनी मला…”; माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट