Share

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र मागे राहिला अन् गुजरात पुढे गेला – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, नंतरच्या अडीच वर्षाच्या … Read more

Published On: 

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता.

मात्र, नंतरच्या अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्र मागे राहिला आणि गुजरात पुढे गेला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे.

Our government has not taken any decision for personal interest – Eknath Shinde 

एकनाथ शिंदे म्हणाले, “जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, नंतरच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र मागे राहिला आणि गुजरात पुढे गेला.

परंतु, आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आला आहे आणि हे मी अभिमानाने सांगतो. आपल्या सरकारने एकही निर्णय वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, “सरकार आपल्या पाठीशी कायम आहे. पाऊस पडेल आणि आपला कोटा पूर्ण होईल, असं मला वाटत आहे. त्याचबरोबर सरकारने एनडीआरएफचे नियम मोडून मदत केली आहे.

शासनाने एक रुपयात पीक विमा योजना उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा  हजार रुपये देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे.

आपला देश आणि राज्य प्रगतीपथावर आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाचं मन जिंकण्याचं काम केलं आहे.

या गोष्टीचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येईल.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही