🕒 1 min read
Chandrashekhar Bawankule | नागपूर: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सुरू असताना वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला असल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
There is no lathicharge on varkari
आळंदीमध्ये घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “आळंदीमध्ये पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालेला नाही. या घटनेवरून विरोधक फक्त राजकारण करत आहेत. विरोधकांनी याचं राजकारण करू नये.”
पुढे बोलताना ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “काल घडलेल्या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. त्या फुटेजमध्ये पोलीस वारकऱ्यांना लाठीचार्ज करताना दिसत नाही. पोलीस फक्त मंदिरामध्ये प्रवेश करण्यावरून वारकऱ्यांना थांबवत आहे. तरीही विरोधकांना या गोष्टीचा राजकारण करायचं आहे.”
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आळंदीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती. तेव्हा देखील असाच काहीतरी प्रकार घडला होता. मात्र, त्या गोष्टीचं आम्ही राजकारण केलं नव्हतं,” असही ते (Chandrashekhar Bawankule) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | भाजप शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांची हकालपट्टी करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले
- Asaduddin Owaisi | “माझं मुघलांवर प्रेम…”; असदुद्दीन ओवैसी यांचं खळबळ जनक वक्तव्य
- Supriya Sule | मला आमची ही घराणेशाही मान्य आहे – सुप्रिया सुळे
- Warkari Lathi Charge । वारकऱ्यांवर लाठीमार करण्याची हिम्मत होतेच कशी? शिंदे – फडणवीसांचा हिंदुत्वाचा बुरखा टरा टरा फाटला
- Prakash Ambedkar | 2 गरोदर महिला अन् पोलिसांची क्रूर वागणूक; आळंदीमध्ये घडलेल्या प्रकरणावर प्रकाश आंबेडकर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










