🕒 1 min read
क्रिकेटचं वेड माणसाला काय करायला लावेल, याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय आता खुद्द सचिन तेंडुलकरच्या लेकाने दिलाय. डोक्यावरच्या अक्षता सुकण्याआधीच अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) थेट क्रिकेटच्या मैदानात उतरल्याने क्रीडा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
५ मार्च रोजी मुंबईत अर्जुनने सानिया चंडोकसोबत अगदी थाटामाटात लग्नगाठ बांधली. या सोहळ्याला बड्या दिग्गजांची मांदियाळी होती. पण खरी चर्चा रंगली ती दुसऱ्याच दिवशी! अर्जुनने सुट्ट्यांचा आनंद घेण्याऐवजी डीवाय पाटील टी-२० ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी थेट मैदान गाठलं. अर्जुनच्या या क्रिकेटवरील निष्ठेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
Arjun Tendulkar News
पण दुर्दैवाने या ताज्या Arjun Tendulkar News मध्ये चाहत्यांसाठी थोडी निराशा आहे. डीवाय पाटील ब्लू संघाकडून खेळताना अर्जुनला काही खास कमाल दाखवता आली नाही. फलंदाजीत त्याने फक्त ९ धावा केल्या, तर गोलंदाजीत एकाच षटकात तब्बल २० धावा लुटवल्या.
या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई कस्टम्सने डीवाय पाटील ब्लूचा अक्षरशः धुव्वा उडवला. पहिल्या डावात फलंदाजी करताना ब्लू संघाला कसाबसा १५६ धावांचा पल्ला गाठता आला. कर्णधार शशांक सिंहने सर्वाधिक ४२ धावा केल्या. मागील सामन्यात धुमाकूळ घालणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीही यावेळी शून्यावर बाद झाला.
मुंबई कस्टम्सने हे १५६ धावांचे आव्हान अवघ्या १६ षटकांत पूर्ण करत दिमाखात फायनल गाठली. अर्जुनचा संघ जरी हरला असला आणि त्याची कामगिरी निराशाजनक असली, तरी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मैदानात उतरण्याच्या त्याच्या जिद्दीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गौतमी पाटीलचा ‘लाडकी बहीण’मध्ये राडा; ‘त्या’ एका गाण्याने थिएटरमध्ये उडणार खळबळ!
- IND vs NZ Final : बुमराहची धास्ती अन् न्यूझीलंडची प्रार्थना; फायनलआधीच ग्लेन फिलिप्सचा मोठा खुलासा!
- लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी फडणवीसांसमोरच उघड केलं रहस्य, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











