🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली बाजू मांडताना संताप व्यक्त केला आहे. “कोणाच्या लग्नाला गेलो म्हणून जर माझी चूक असेल, तर मला फासावर लटकवा,” असं थेट वक्तव्य त्यांनी केलं आहे.
वैष्णवी ही अजित पवारांच्या गटाच्या एका नेत्याची सून होती. लग्नावेळी अजित पवारही उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर आरोप होत असतानाच त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली. “मी लग्नाला गेलो म्हणून मला दोष देताय? माझं काय घेणं-देणं आहे त्यांचं घरात काय चाललंय याचं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Ajit Pawar on Vaishnavi Suicide Case
“सासू, नणंद आणि नवरा हे तुरुंगात आहेत. सासरा फरार आहे, पण लवकरच सापडेल. मी पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत – जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा,” असं अजित पवार म्हणाले.
“माझी चूक नसेल तर उगाच नाव घ्या नका. मी कोणालाही सुनेशी वाईट वागा, त्रास द्या असं सांगत नाही. उलट मी लाडक्या बहिणींना १५०० रुपये देणं सुरू केलं – अशी योजना आम्ही सुरू केली आहे,” असं सांगून त्यांनी प्रसारमाध्यमांवरही नाराजी व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी; मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या आग्रहामुळे झाली शपथ
- IPL 2025: GT vs LSG Dream11 टीम तयार करताना ‘या’ खेळाडूंवर ठेवा विश्वास!
- महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! 2 दिवसांत 24 मृत्यू, वीज व झाडांच्या दुर्घटनांनी वाढली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











