Share

‘रामरक्षकांसोबत आहात की मंदिर लुटणाऱ्यांसोबत?’ उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

नागपूरातील ‘रामरक्षा’ कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि RSS यांच्यावर जोरदार टीका करत अनेक थेट सवाल उपस्थित केले.

Published On: 

Uddhav Thackeray

नागपूर: अयोध्येतील राम मंदिरातील (Ayodhya Ram Mandir) कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज नागपुरात (Nagpur) रामरक्षा  (Ramraksha) पठण आंदोलन केले. यापूर्वी त्यांनी दादर आणि ठाणे येथेही अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. नागपुरातील या आंदोलनाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली. या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले.

‘आम्ही तिथेच मंदिर उभारू’ ही घोषणा कशासाठी? केवळ लूट करण्यासाठी? जी माणसे मंदिरांची लूट करतात, त्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत. फडणवीसांनी आमची थट्टा आणि चेष्टा करणे थांबवावे. त्यांनी आधी हे स्पष्ट करावे की ते रामरक्षकांचे समर्थन करतात की मंदिर लुटणाऱ्यांचे,” असा थेट सवाल उद्देशून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. ‘रामरक्षा’ पठण झाले आहे की नाही, याबद्दल आम्हाला ‘क्लास मॉनिटर’सारखा उपदेश करू नका. रामभक्तांना खुद्द रामाच्या रक्षणासाठी पुढे यावं लागत आहे, यापेक्षा दुर्दैवी बाब दुसरी कोणती असू शकते?” असे म्हणत कडक शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, “संजय राऊत म्हणाले, टेलिप्रांटर ठेवायचं का?, मी म्हटलं का? फडणवीस यांनी चॅलेंज दिलं होतं की, रामरक्षा म्हणून दाखवायची. पण, ‘रामरक्षा’ म्हणण्याचं तुमचं काम असलं तरी ‘रामरक्षा’ करण्याचं आमचं काम आहे. आम्ही ‘रामरक्षक’ आहोत. मनी नाव भाव आणि देवा मला पाव असं आमचं हिंदुत्व नाही. पहिली बातमी दिल्लीतून आली. सोनम वांगचूक हे आंदोलन करत होते, पोलीस आंदोलनात घुसले आणि वांगचूक यांना घेऊन गेले. प्रभू रामचंद्रांना विचारतोय, रामाचं नाव समोर करून भाजप सरकार स्थापन झालं. पण यांच्या अंगामध्ये सैतान आला आहे का, इतकं कसं माजल्यावानी वागत आहे.

मला मोहन भागवत यांना विचारायचे आहे. भागवत-साहेब, भाजप सरकार ज्या प्रकारे वागत आहे ते पहा. मंदिरे लुटली जात आहेत, परीक्षांचे पेपर फुटत आहेत, राजकीय पक्ष फोडले जात आहेत आणि मंदिरांच्या तिजोऱ्या फोडल्या जात आहेत. हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होते काय? ही आमची हिंदुत्वाची संकल्पना नाही. आम्हाला ‘रामराज्य’ हवे आहे. भ्रष्ट कंत्राटदारांना पाठीशी घालणारे हिंदू राष्ट्र आम्हाला नको आहे. भागवत-साहेब, तुम्ही एकदा म्हणाला होतात की या देशातील मुस्लिम हे मुळात हिंदूच आहेत आणि हिंदूंनी दोन-तीन मुले जन्माला घातली पाहिजेत. मग, जेव्हा ही मुले जन्माला येतात आणि परीक्षांचे पेपर फुटतात, तेव्हा काय होते? त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच तुम्ही त्यांना आणखी मुले जन्माला घालायला सांगणार का? हे ते हिंदू राष्ट्र नाही जे आम्हाला हवे आहे.

जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा भाजपचे नेते तिथून पळून गेले होते, पण हे काम माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर ‘गर्व से कहो हम हिंदू है’, असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब म्हणाले होते. अनेकांनी आंदोलन केले आणि तुरुंगवास भोगला. बाळासाहेबांनी खूप मोठी जोखीम पत्करली होती. ‘मंदिर वही बनायेंगे’ ही घोषणा मंदिर लुटण्यासाठी होती का? आम्ही आहोत मंदिरा लुटारूंच्या विरोधात आहोत, फडणवीस यांनी आमची चेष्टा, टिंगल करण्याचे सोडून द्यावे. त्यांनी आधी हे स्पष्ट करावे की ते रामाच्या रक्षकांसोबत आहेत की मंदिर लुटणाऱ्यांसोबत.

“‘रामरक्षा’ पाठ केली आहे की नाही, असे विचारणाऱ्या वर्गातील ‘मॉनिटर’सारखे बोलू नका. रामाच्या भक्तांनाच आता खुद्द रामाचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे लागत आहे, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय?” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही