नवी दिल्ली: NEET परीक्षा पेपरफुटीच्या (Paper Leak) प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना त्यांनी यावर भर दिला की, विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचे भविष्य हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘फास्ट-ट्रॅक न्यायालये’ (Fast Track Courts) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
संबंधित विभागांना सर्व आवश्यक कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
ट्विट करत मोदींनी कडक इशारा दिला आणि म्हटले की, “देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही.” दोषींवर कठोर कारवाई करण्यास सरकार कटिबद्ध आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद करण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन केली जातील.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे ट्वीट
“देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांतील दोषींना शक्य तितक्या लवकर कठोर शिक्षा मिळावी आणि या प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा, यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये (Fast Track Courts) स्थापन करण्यात येणार आहेत. यासंदर्भात संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.”
📌 महत्वाच्या बातम्या
- Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरूच; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
- NEET Protest : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नाही; सरकारचा मोठा प्रस्ताव जाहीर
- …तर NEET ही परीक्षाच पूर्णपणे रद्द केली पाहिजे; मुख्यमंत्री विजय यांची मोठी मागणी













