🕒 1 min read
राजकारणात जनतेने भरभरून कौल दिला तरी खुर्ची मिळेलच याची शाश्वती नसते, याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा तमिळनाडूत येत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयच्या (Vijay Thalapathy) ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठा करिष्मा केलाय.
पण तरीही विजयला मुख्यमंत्रीपदापासून मुद्दाम रोखलं जातंय का? असा गंभीर सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. याच मुद्द्यावरून आता अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी थेट तमिळनाडूच्या राज्यपालांवरच जोरदार हल्लाबोल केला आहे.
Vijay Thalapathy CM News
अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीकेने द्रमुक आणि अण्णाद्रमुकसारख्या मातब्बर पक्षांना धोबीपछाड देत २३३ पैकी तब्बल १०८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. पण सरकार स्थापनेसाठी ११८ आमदारांचा जादुई आकडा गाठणं गरजेचं आहे. स्वतः विजयने दोन जागांवरून विजय मिळवला आहे, त्यामुळे त्याला एक जागा सोडावी लागेल आणि पक्षाचे संख्याबळ १०७ वर येईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, ६ मे रोजी थलपती विजयने सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली होती. मात्र, पुरेसं बहुमत नसल्याचं सांगत राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही विजयने पुन्हा प्रयत्न केला, पण त्याला रिकाम्या हातानेच परतावं लागलं.
या संपूर्ण प्रकारामुळे तमिळनाडूचं राजकारण चांगलंच तापलं आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर टीव्हीके कार्यकर्त्यांचा व्हिडिओ शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला. “राज्यपालांचे हे वर्तन घृणास्पद आणि अस्वीकार्य आहे. बहुमताचा निर्णय राजभवनात नाही, तर विधानसभेत होतो,” असा मोठा गौप्यस्फोट करत त्यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. विजयला जनतेचा कौल मिळाला असून त्याला सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळायलाच हवी, अशी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका प्रकाश राज यांनी घेतली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हार्दिक पांड्या अंबानींना सोडणार? ‘चेन्नई’मध्ये एन्ट्रीच्या चर्चांनी आयपीएलमध्ये उडाली मोठी खळबळ!
- सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी धोक्यात; BCCI कडून मोठा झटका? ‘हा’ स्टार खेळाडू होणार नवा बॉस!
- गोविंदाच्या बायकोला दारूवरून डिवचलं; संतापलेल्या सुनिता आहुजाचा थेट बापावरून उद्धार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












