Share

दुखापतीमुळे कोणाचं नुकसान, कोणाचा फायदा? टीम इंडियात ‘या’ दोन वाघांची अचानक एन्ट्री!

वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा दुखापतग्रस्त झाल्याने Shreyas Iyer आणि Ravi Bishnoi यांची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत एन्ट्री झाली आहे.

Published On: 

Shreyas Iyer & Ravi Bishnoi Comeback: टीम इंडियात मोठे बदल, दोघांची एन्ट्री

🕒 1 min read

मुंबई – “एखाद्याचं नशीब कधी आणि कसं उघडेल, हे क्रिकेटच्या मैदानात सांगता येत नाही…” याचाच प्रत्यय आता टीम इंडियाच्या चाहत्यांना आला आहे. टी-20 वर्ल्ड कप २०२६ च्या तयारीसाठी भारतीय संघ सज्ज होत असतानाच बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी (१६ जानेवारी) एक मोठी घोषणा केली आहे. दुखापतींच्या सत्रामुळे टीम इंडियात मोठे फेरबदल करण्यात आले असून, स्टार बॅट्समन Shreyas Iyer आणि युवा स्पिनर रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांचे टी-20 संघात रॉयल कमबॅक झाले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेपूर्वीच वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा हे दोन शिलेदार दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. बडोद्यातील पहिल्या वनडे मॅचदरम्यान गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरला ‘साईड स्ट्रेन’चा त्रास झाला होता. स्कॅनिंगनंतर डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे, त्यामुळे तो पूर्ण ५ सामन्यांच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी फिरकीची धुरा सांभाळण्यासाठी Ravi Bishnoi ला पाचारण करण्यात आले आहे.

Shreyas Iyer T20 Comeback

दुसरीकडे, तिलक वर्माच्या दुखापतीने श्रेयस अय्यरसाठी (Shreyas Iyer) टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. डिसेंबर २०२३ नंतर श्रेयस पहिल्यांदाच टी-20 फॉरमॅटमध्ये परतत आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सला (Punjab Kings) फायनलपर्यंत नेण्यात श्रेयसने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने त्या सिझनमध्ये १७५ च्या स्ट्राईक रेटने तब्बल ६०४ धावा कुटल्या होत्या. त्याच्या याच धमाकेदार फॉर्मची दखल घेत निवड समितीने त्याला पहिल्या ३ टी-20 सामन्यांसाठी संधी दिली आहे.

श्रेयस अय्यर सध्या वन-डे संघाचा उपकर्णधार असला तरी, टी-20 मध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी ही सिरीज त्याच्यासाठी ‘करो या मरो’ अशीच असणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन सुंदरला आता उपचारासाठी बंगळुरुच्या एनसीएमध्ये (NCA) पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत श्रेयस आणि बिश्नोई कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टीम इंडिया (T20 Squad): सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (पहिल्या ३ सामन्यांसाठी), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन, रवी बिश्नोई.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या