🕒 1 min read
Raj Thackeray | मुंबई : सध्या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं आहे. हे सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड केले आणि शिवसेनेचे दोन गट पडले. यावरून राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात शिवसेना फुटली तेव्हा खूप त्रास झाला, जो पक्ष लहानपणापासून पाहत आलोय. पाहतच नाही तर पक्ष अनुभवत आलोय. त्या पक्षाचं धनुष्यबाण आणि शिवसेना नाव यावरून वाद सुरू होता. एकाला शिवसेना सांभाळता नाही आली. पण आता दुसऱ्याला तरी सांभाळता येईल का?” असा सवाल त्यांनी भाषणातून केला.
“धनुष्यबाण कोणालाही सांभाळता येणार नाही”
शिवसेना पक्ष हा लहानपणापासूनच बघत आलोय. मी माझ्या छातीवर वाघ घेऊन जगलोय. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना पक्ष आता एकाला झेपला नाही. आता दुसऱ्याला तरी झेपेल का? “धनुष्यबाण हे फक्त बाळासाहेबांना पेललं आहे, इतर दुसऱ्या कोणालाही पेललं नाही”, असे राज ठाकरे सभेत सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल बोलले.
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | ‘या’ बँकेत नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
- Cucumber Salad | उन्हाळ्यामध्ये काकडीची कोशिंबीर खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Job Opportunity | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
- Garlic | केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी लसणाच्या ‘या’ पद्धतीने करा वापर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










