Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. या रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं आहे.
अशात या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार महाराष्ट्राला लागेला कलंक आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Shinde-Fadnavis-Pawar government is a disgrace to Maharashtra – Nana Patole
ट्विट करत नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “नांदेड व संभाजीनगर रुग्णालयातील मृत्यू हे सरकारी हत्या आहेत,सरकार वर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजे भाजपाप्रणित सरकारच्या अनास्थेमुळे राज्यातील सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे.
औषध खरेदीतील ४० टक्के मलईच्या वाट्यामुळे खरेदी रखडली? राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार महाराष्ट्राला लागेला कलंक आहे .ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही.
ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत.
राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. औषधे नसल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे हे अत्यंत चीड आणणारे आहे.
सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट करण्यासाठी, जाहीरातबाजी करण्यासाठी आणि आमदार खरेदीसाठी पैसे आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या औषधे खरेदीसाठी पैसे नाहीत का? असा संतप्त सवाल करत हे सरकारी अनास्थेचे बळी असून ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजे.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला भ्रष्टाचाराच्या भस्म्या रोग झाला असून संपूर्ण यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नाहीत, औषधांचा तुटवडा आहे.
रुग्णालयातील यंत्रसामुग्री नादुरुस्त असल्याने धुळ खात पडलेली आहे. मोठ्या शहरामध्ये आरोग्य सेवांची ही अवस्था आहे तर ग्रामीण रुग्णालयातील अवस्था काय असेल याची कल्पना न केलेली बरी.
शासकीय रुग्णालये मृत्यूचे सापळे झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग ४० टक्क्यांची मलई खाण्यासाठी वेळेत औषधी खरेदी केली नाही. त्यामुळे २०२२ मध्ये तरतूद केलेला ६०० कोटींचा निधी परत गेला.
भाजपा सरकारने १५ ऑगस्टपासून राज्यात मोफत आरोग्य सेवा सुरु केल्याचा मोठा गाजावाजा केला पण रुग्णालयात सरकार सेवा देत नसून मृत्यू देत आहे. भाजपा सरकारच्या काळात मरण स्वस्त झाले आहे हेच यावरून दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाणे शासकीय रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच रात्री १८ मृत्यू झाले, त्यावर चौकशी समिती नेमली गेली त्या समितीचे काय झाले? एकाद्या डॉक्टर वा वैद्यकीय कर्मचाऱ्याला निलंबित करुन हे प्रकार थांबणार नाहीत.
संबंधित मंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचे मृत्यू होत असताना संबंधित खात्याचे मंत्री काय करतात? मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीशी संवेदना शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची हकालपट्टी करावी.”
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | राज्यात महायुतीच्या 45 जागा आणायच्या; बावनकुळेंच्या भाजप नेत्यांना सूचना
- Vijay Wadettiwar | मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते महाराष्ट्रात सत्ता चालवताय – विजय वडेट्टीवार
- Supriya Sule | भाजपला सामान्य जनतेचे आणखीन किती बळी हवे? – सुप्रिया सुळे
- Aditya Thackeray | भाजप-मिंधेंना खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्क नाही – आदित्य ठाकरे
- Sanjay Raut | राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही? – संजय राऊत