Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू केलं होतं.
15 हुन अधिक दिवस त्यांनी अन्नत्याग करत उपोषण केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं.
उपोषण मागे घेतलं असलं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आज महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तब्बल 13 जिल्ह्यांना भेट देणार आहे.
Manoj Jarange will leave for Maharashtra tour from today
मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते तब्बल 13 जिल्ह्यांना भेट देणार आहे.
त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात अंतरवली सराटी या गावातून होणार आहे. तर त्यांचा पहिला मुक्काम परभणी जिल्ह्यातील जिंतूर या ठिकाणी होणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे जालना जिल्ह्यासोबतच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहे. मराठवाड्यानंतर ते यवतमाळ, नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांना देखील भेट देणार आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 40 दिवसांचा वेळ दिला होता. 14 ऑक्टोबर रोजी या 40 दिवसातील 30 दिवस संपणार आहे.
14 ऑक्टोबरला मराठा समाजाची जाहीर सभा घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं होतं. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणि मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी मनोज जरांगे हा दौरा करत असल्याचं बोललं जात आहे.
मनोज जरांगे यांच्या या दौऱ्यादरम्यान नक्की काय घडणार? त्यांच्या दौऱ्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? याकडे आता संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | अजित पवार आत, तर गोपीचंद पडळकर बाहेर; फडणवीसांच्या बंगल्यावर नेमकं काय झालं?
- Nitesh Rane | ठाकरे गट म्हणजे शरद पवारांनी थुंकलेली सुपारी – नितेश राणे
- Chitra Wagh | गांजा ओढून बेताल बडबड करणाऱ्या राऊतांमुळे ठाकरेंचा उरला सुरला पक्ष बुडतोय – चित्रा वाघ
- Vijay Wadettiwar | ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगेंच्या मागणीला आमचा विरोध – विजय वडेट्टीवार
- Bacchu Kadu | अपंगांची कामं होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही – बच्चू कडू