🕒 1 min read
नागपूर – यंदा पाऊस वेळेवर पडेल आणि पेरणी उरकता येईल, या आशेवर तुम्ही बसला आहात का? जर हो, तर बळीराजासाठी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यासह संपूर्ण देशभरात सध्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र, मान्सूनचं आगमन लांबणीवर पडलं असून, यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार, आगामी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ‘अलनिनो’चा (El Nino) प्रभाव मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यामुळेच विदर्भात यंदा पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी राहणार आहे. या भागात जेमतेम ९२ ते ९४ टक्क्यांपर्यंतच पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा प्राथमिक अंदाज आहे. विदर्भात साधारणतः १० ते १५ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Monsoon update IMD alerts
सध्याची परिस्थिती पाहता, केरळमध्येच अद्याप मान्सून पोहोचलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात १० जूनपर्यंत तरी पावसाचे आगमन होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
अरबी समुद्रात मॉन्सूनसाठी जी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती, ती आता पुन्हा बदलली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, ‘लॉन्ग रेंज फोरकास्ट’च्या नव्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशातच यंदा मान्सून कमजोर राहील. विदर्भातील बहुतांश भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या काही भागांत दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.
केरळमध्ये मान्सून धडकल्यानंतरच समुद्रातील स्थिती आणि वाऱ्याचा वेग ठरवेल की पावसाची पुढील वाटचाल कशी राहील. त्यामुळे जमिनीत पुरेशी ओल निर्माण होईल इतका दमदार पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई अजिबात करू नये, असा स्पष्ट सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रामदास आठवले यांचा मराठा आरक्षणावर मोठा गौप्यस्फोट; जरांगे पाटलांच्या मागणीवर थेट म्हणाले…
- रामदास आठवले यांची अजब मागणी; थेट ‘हातभट्टीची दारू’ अधिकृत करा, कारण ऐकून उडेल झोप!
- अंबादास दानवे यांचा मोठा गौप्यस्फोट; लाडकी बहीण योजनेतून आणखी ५०-६० लाख महिला अपात्र ठरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












