🕒 1 min read
IND vs WI – टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताने जे आजवर कधीच केलं नव्हतं, ते आज रात्री घडलं! १९६ धावांचं महाकाय आव्हान टीम इंडिया सहज पार करेल, असा विचार तरी कोणी केला होता का?
पण संजू सॅमसनने काल मैदानात अक्षरशः वादळ आणलं. त्याच्या (Sanju Samson) ९७ धावांच्या वादळी खेळीपुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज अक्षरशः लोटांगण घालताना दिसले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने रोव्हमन पॉवेल आणि जेसन होल्डर यांच्या तुफानी भागीदारीच्या जोरावर २० षटकांत १९५ धावांचा डोंगर उभा केला होता. भारतीय गोलंदाजांची अखेरच्या षटकांत चांगलीच धुलाई झाली होती.
IND vs WI T20 World Cup 2026 | Sanju Samson
विजयासाठी भारतासमोर १९६ धावांचे कठीण लक्ष्य होते. त्यातच ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१८ धावा) स्वस्तात माघारी परतल्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
पण संजू सॅमसनने एका बाजूने भक्कमपणे किल्ला लढवला. त्याने मैदानभर फटकेबाजी करत इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याला युवा तिलक वर्माने १४ चेंडूंत ३२ धावा कुटत अत्यंत मोक्याच्या क्षणी भक्कम साथ दिली.
सामना शेवटच्या षटकांत पोहोचला तेव्हा श्वास रोखून धरायला लावणारा थरार पाहायला मिळाला. हार्दिक पांड्याही १५ धावा करून तंबूत परतला. संजू शतकाच्या अगदी उंबरठ्यावर होता, पण विजयासाठी फक्त काही धावांची गरज असताना त्याचे हे ऐतिहासिक शतक अवघ्या ३ धावांसाठी हुकले.
शतक पूर्ण झाले नसले, तरी संजूने (Sanju Samson) भारताला एकहाती विजय मिळवून दिला. भारताने १९.२ षटकांत ५ गडी गमावून १९९ धावा करत या रोमहर्षक सामन्यात बाजी मारली.
विश्वचषकाच्या इतिहासात एवढे मोठे लक्ष्य पार करत टीम इंडियाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. संजूच्या या जिगरबाज खेळीचे आता जगभरातून कौतुक होत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सूर्याच्या टीम इंडियासमोर ‘करो किंवा मरो’चे आव्हान! वेस्ट इंडिजविरुद्ध हरल्यास वर्ल्ड कपमधून बाहेर?
- हार्दिक पंड्याचा झंझावात! टीम इंडियाचा दणदणीत विजय, सेमीफायनलचे गणित बदलले!
- हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरचा नवा लूक; काळ्या ड्रेसमधील ग्लॅमरस अवतार, पाहा हटके PHOTO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











