🕒 1 min read
गेल्या १५ दिवसांपासून चातकासारखी आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची प्रतीक्षा संपणार की चिंता आणखी वाढणार? हवामान विभागाने आता राज्यातील पावसाबाबत अत्यंत मोठी माहिती दिली आहे.
अरबी समुद्रात गेल्या दोन आठवड्यांपासून रेंगाळलेल्या मॉन्सूनने (Monsoon Update) अखेर पुढची वाटचाल सुरू केलीये. हा ताजा Monsoon Update शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा असून, पाऊस आता पुणे, लातूर, धाराशिव आणि अलिबागच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे.
Maharashtra Monsoon Update
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्यापर्यंत मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होईल. ४ जूनला केरळमध्ये आलेल्या आणि ८ जूनला तळ कोकणात पोहोचलेल्या पावसाची गती अचानक मंदावली होती. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या, पण आता पाऊस सुसाट धावतोय.
दुसरीकडे, विदर्भातील जिल्ह्यांसाठी आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी रिमझिम सुरू झाली आहे. पुण्यातही आज पावसाचा इशारा देण्यात आलाय.
पाऊस उशिरा आला असला तरी सध्या राज्यात पोषक वातावरण तयार झालं आहे. धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार एन्ट्री केलीये. त्यामुळे कडक उन्हाने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना कमालीचा गारवा अनुभवता येत आहे.
नाशिकच्या लासलगाव परिसरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. पेरण्या रखडल्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी वर्ग या पावसामुळे सुखावला आहे. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन पेरणी योग्य वातावरण होण्यासाठी अजून दोन ते तीन मोठ्या पावसाची गरज असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- आत बरंच काही घडतं; बिग बॉसच्या घरात दारू दिली जाते? बिग बॉस विजेतीनेच सगळं सांगितलं
- दिपाली सय्यद बनल्या रुपाली चाकणकर, फर्स्ट लूक आला समोर; पण ‘भोंदू खरात’ कोण?
- रितेश देशमुख भडकला! सलमान अन् संजय दत्तच्या प्रश्नावर पत्रकाराला भर कार्यक्रमात सुनावलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












