Share

Jitendra Awhad | जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड अजित पवार गटात जाणार? आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं

🕒 1 min readJitendra Awhad | मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) काल (06 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांची भेट घेतली असल्याची चर्चा रंगली आहे. या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील अजित पवार (Ajit Pawar) गटात सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Jitendra Awhad | मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) काल (06 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांची भेट घेतली असल्याची चर्चा रंगली आहे.

या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील अजित पवार (Ajit Pawar) गटात सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

I and Jayant Patil will always be with Sharad Pawar – Jitendra Awhad

जयंत पाटील यांच्यासह तुम्ही देखील अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे. या प्रश्नाचं उत्तर देत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “मी आणि जयंत पाटील कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत.

आमच्याबद्दल मुद्दाम अशा बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही ब्लॉगर्स आहेत. ज्यांच्या माध्यमातून जयंत पाटील आणि माझ्या विषयी या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत.

मात्र माझ्याबद्दल अशा चर्चा होणं हा माझ्यासाठी खूप मोठा अपमान आहे. मी आणि जयंत पाटील कायम शरद पवारांसोबत राहणार आहोत आणि हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो.

या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत देखील प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.

जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. ही पेरणी कशासाठी केली जातेय, हे आम्हांला बरोबर समजतंय.

जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की,” जितेंद्र साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही.”

मला वाटत नाही की,प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,”आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत.” आम्ही मागेच सांगितल आहे की, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही.

तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही.

सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!