Sanjay Raut | जम्मू : शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. शिंदेनी 40 आमदारांसोबत बंड केल्यानंतर भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जाऊ लागला आहे. हा वाद आधी न्यायालयात आणि आता निवडणूक आयोगासमोर पोहोचला आहे. दोन्ही गटाच्या युक्तीवादानंतर निवडणूक आयोगाने निकाल न देता 30 जानेवारीची पुढची तारीख दिली. त्यावरुन शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
“निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव आहे. त्यामुळेच निकाल द्यायला वेळलागत आहे. शिवसेनेचा अध्यक्ष कोण असावा हे आमचा पक्ष ठरवेल. इतर कोणीही ठरवणार नाही. अध्यक्ष ठरवणं न ठरवणं हा तांत्रिक मुद्दा आहे”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
“पक्षाचा अध्यक्ष ठरवण्याच्या प्रकरणात निवडणूक आयोग आला आहे. पण आमचा अध्यक्ष कोण असावा हे आमचा पक्ष ठरवेल. बाळासाहेब ठाकरे हे अजीवन अध्यक्ष होते. निवडणूक आयोगाने नियम केल्यानंतर आम्ही नंतर निवडणूक घ्यायचो. उद्धव ठाकरे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. तेच राहतील”, असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.
दरम्यान, संजय राऊत हे जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच जम्मूमध्ये शिवसेना निवडणूक लढणार असल्याचेही राऊतांनी जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | ‘कसबा, पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करा’; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना साकडे
- Sanjay Raut | “आमचा पक्ष प्रमुख कोण असेल ते पक्ष ठरवेल” – संजय राऊत
- Eknath Shinde – Sharad Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार आज एकाच व्यासपीठावर
- Chandrashekhar Bawankule | “तुमच्या रक्तात बेईमानी आहे, बेईमानी करतच तुम्ही…”; बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात
- Ajit Pawar | पार्थ पवार – शंभूराज देसाई भेटीसंदर्भात अजित पवार म्हणाले, “राजकीय विरोधक म्हणजे…”