🕒 1 min read
अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे भाव वाढले की सामान्यांचे बजेट कोलमडतं, पण सध्याच्या महागाईला कारणीभूत ठरलेली गोष्ट काही वेगळीच आहे, असं म्हटलं तर? हो, हे खरं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकताच एक धक्कादायक खुलासा केला असून, महागाई वाढण्यामागे डाळ-तांदूळ किंवा कांदा-बटाटा नसून भलतंच कारण समोर आलं आहे.
फेब्रुवारीच्या पतधोरण बैठकीत आरबीआयने स्पष्ट केलं की, सध्या महागाईवर जो दबाव दिसतोय, तो भाज्यांपेक्षा सोने आणि चांदीच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे जास्त आहे. मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेली वाढ थेट ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) परिणाम करत आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, सोने वगळता डिसेंबरमध्ये कोअर इन्फ्लेशन केवळ २.६ टक्के इतके होते, जे सुरक्षित मानले जाते. मात्र, सोन्या-चांदीचा समावेश करताच हे चित्र पूर्णपणे बदलून महागाई वाढलेली दिसते.
Rbi On Gold Silver Price Inflation
सामान्य लोकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, पुढच्या काळात अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहण्याची दाट शक्यता आहे. खरीप हंगामातील चांगलं पीक, सरकारचा बफर स्टॉक आणि रब्बीची दमदार पेरणी यामुळे गहू, तांदूळ आणि डाळींचे दर भडकणार नाहीत, असा अंदाज बँकिंग क्षेत्रातील सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.
जागतिक बाजारपेठेतील युद्धजन्य परिस्थिती आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती दिली आहे. डॉलरचं मूल्य आणि आर्थिक मंदीच्या भीतीमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही ‘खळबळ’ उडाली आहे. थोडक्यात सांगायचं तर, सध्या महागाईची झळ स्वयंपाकघरापेक्षा दागिन्यांच्या दुकानातून जास्त पोहोचतेय, असं आरबीआयचं म्हणणं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ट्रोलर्समुळे मिळतायत जाहिराती! सचिन पिळगावकर यांचा ट्रोलर्सना जबरदस्त टोला, म्हणाले….
- ‘पुढच्या पिढीचं काय होणार?’; लग्नाबद्दल बोलताना प्रियदर्शनीने मांडलं ‘भयाण’ वास्तव
- विदर्भाचं नशीब पालटणार? नागपुरात १५,००० कोटींचा प्रकल्प अन् सर्वात मोठी ‘ही’ योजना; ‘देवाभाऊं’ची मोठी घोषणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











