Share

PM मोदींचा मोठा निर्णय! नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स

राष्ट्रीय परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

Published On: 

PM Modi

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये व्यापक सुधारणा करण्यासाठी, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी (Nandan Nilekani) यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्च-स्तरीय कार्यगटाची (टास्क फोर्स) (Task Force) स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी केली. परीक्षा प्रणाली अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्याबाबत हा टास्क फोर्स शिफारसी करेल.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एका व्हिडिओ संदेशाद्वारे ही घोषणा केली. या कार्यगटात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश असून, तो परीक्षा प्रणालीमधील तांत्रिक आणि संरचनात्मक सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल.

कार्यगटाच्या शिफारसींच्या आधारे, सरकार परीक्षा प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणांची अंमलबजावणी करेल. देशात एक निर्दोष आणि विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या एका दिवसात ही घोषणा करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा कोणतेही पद मोठे नाही!

भाजप कार्यकर्त्यांसाठी देशातील युवा आणि विद्यार्थी हे कोणत्याही अधिकृत पदापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे याच तत्त्वाचे उदाहरण असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नमूद केले.

मोदी सरकार नेहमीच देश आणि देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करते. पेपरफुटीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुधारणा राबवण्यास सरकार कटिबद्ध आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पंतप्रधान मोदींचे निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहेत. या उपाययोजनांमुळे NEET परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

‘विकसित भारत’ घडवण्यात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मपुरते मर्यादित न राहता, त्यांनी गावांना भेटी देऊन भारताला समजून घेतले पाहिजे, तिथल्या जीवनाचा अनुभव घेतला पाहिजे आणि विकासाच्या आकांक्षा समजून घेतल्या पाहिजेत. गावांना भेट दिल्यावरच प्रगतीची क्षमता खऱ्या अर्थाने समजते.

शहा यांना राहुल गांधींचे पत्र

पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही