Share

मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; ‘शहाणा हो, नाहीतर एका फटक्यात…’, मंत्र्यांनाही दिला सज्जड इशारा

एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला असून, मंत्र्यांवर दंगल घडवण्याचा गंभीर आरोप केला आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil angry press conference warning Eknath Shinde

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचं स्पष्ट दिसत आहे. एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख करू नये, या मंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत जरांगे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच अत्यंत जहाल शब्दांत हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदेंना म्हणावं, “ही नाटकं खेळू नका, मराठे मराठ्यांच्या अंगावर सोडायचे. मगतर लवकर संपशील लय. शहाणा हो लवकर, नाहीतर एका फटक्यात संपशील,” असा थेट आणि निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी दिल्याने राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

Manoj Jarange Warn Eknath Shinde

एकनाथ शिंदे तुमचा बाप आहे का?

बुधवारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांची बाजू घेणारे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनाही त्यांनी शेलक्या शब्दांत सुनावलं. “तुम्ही एकनाथ शिंदेंचे समर्थक झालात म्हणून स्वतःच्या जातीला विसरणार का? एकनाथ शिंदे तुमचा बाप आहे का?” असा संतप्त सवाल करत माझी भाषा इथून पुढे अधिकच तिखट होईल, असं जरांगे यांनी ठणकावून सांगितलं.

‘मराठ्यांमध्ये मारामाऱ्या लावून दंगल घडवण्याचा कट’

दुसरीकडे, जरांगे यांनी उदय सामंत आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर एक गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. सामंत आणि शिरसाट यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडवण्याविषयी फोनवर बोलणं झाल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. ‘एकाने हाणल्यासारखं आणि दुसऱ्याने मारल्यासारखं करायचं’, अशी या नेत्यांची योजना असून, मराठ्यांमध्ये मारामाऱ्या लावून दंगल घडवण्याचा सरकारचा डाव असल्याचं ते म्हणाले.

प्रत्येक मंत्री आणि आमदाराकडे ५०० गुंड पोसलेले असल्याचा दावा करत, जरांगे यांनी सरकारला थेट आव्हान दिलं आहे. “तुमच्या गुंडांची एक जरी गोळी आमच्या मराठ्याच्या पोराला लागली, तर ही पोरं तुमचं नरडं फोडतील. आम्ही तुमचे गुंड दगडाखाली ठेचून काढू,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला. उदय सामंत तुम्ही मला दादा म्हणू नका. तुझ्यावाचून काही अडत नाही. सामंत यांनी या प्रकरणी स्वतःच्या मुलाची शपथ घेऊन दाखवावी, असं खुलं आव्हानही जरांगे यांनी दिलं आहे.

मराठ्यांना दिलेली प्रमाणपत्रं रद्द करण्यामागेही शिंदे आणि संजय शिरसाट यांचाच हात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तुम्हाला तुमच्या शिंदेंची माया येते, मग आम्हाला आमच्या समाजाची माया येणार नाही का, असा सवाल करत जरांगे यांनी आता आरपारच्या लढाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही