🕒 1 min read
दिल्ली | २७ एप्रिल: जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांनी भारताला धमकी देण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी अणुहल्ल्याची उघड धमकी दिली आहे. त्यांनी म्हटलं, “भारताने जर पाकिस्तानच्या पाण्यावर गदा आणली, तर आमच्याकडे असलेली १३० अण्वस्त्रे आणि घौरी, शाहीन, गझनवी क्षेपणास्त्रे भारतासाठीच सज्ज आहेत.” भारताने सिंधू नदीचं पाणी रोखल्यास युद्धाला तयार राहावं, असा इशाराही त्यांनी दिला.
After Pahalgam Attack, Pakistan Threatens India With Nuclear Strike Over Water Dispute
याआधी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी यांनीही भारताला धमकावलं होतं. सिंधू नदीच्या मुद्द्यावरून त्यांनी भारताला ‘पाणी वाहील किंवा रक्त’ असा थेट इशारा दिला होता. भुट्टो म्हणाले होते, “सिंधू नदी आमची आहे, आणि ती आमचीच राहील.”
या वक्तव्यांमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता तेच पाहतील… मी काय करणार? अजित पवारांबाबत भुजबळ यांचे मोठे व्यक्तव्य
- ८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका
- फडणवीसांच्या तंबीनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नरमले; व्यक्त केली जाहीरपणे दिलगिरी