🕒 1 min read
बॉलिवूडमधून दूर जाऊन साध्वी झालेल्या ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) यांनी अलीकडेच एका मुलाखतीत पाकिस्तान आणि मुस्लिम समाजाविषयी भावनिक वक्तव्य केलं आहे. ममता कुलकर्णी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमासाठी हजर होत्या, तेव्हा त्यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधला.
ममता म्हणाल्या, “मुस्लिमांविषयी माझ्या मनात नेहमीच प्रेम राहिलं आहे. दुबईमध्ये मी 25 वर्ष अध्यात्मिक साधना केली. तिथे मला खूप शांतता आणि प्रेम मिळालं.” त्यांनी हेही उघड केलं की, “जेव्हा मी बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होते, तेव्हा मला पाकिस्तानातून दररोज 50 पत्रं यायची.”
I love Muslims very much, letters come from Pakistan every day; Mamta Kulkarni’s big revelation
मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “मुस्लिमांवर प्रेम आहे, पण दहशतवाद्यांवर अजिबात नाही. माझं प्रेम शांतीप्रिय लोकांसाठी आहे.”
भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. काश्मीरमधील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.
ममता कुलकर्णीने संन्यास कधी घेतला?
पूर्वी अनेक हिट चित्रपटांमधून झळकलेली ममता कुलकर्णी 24 जानेवारी 2025 रोजी प्रयागराज महाकुंभमध्ये किन्नर आखाड्यातून साध्वी बनली. बॉलिवूडमधून दूर झाल्यावर त्या अध्यात्माकडे वळल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- PBKS vs MI : मुंबई इंडियन्सची क्वालिफायर-2 मध्ये पंजाबशी टक्कर, कोण पोहचणार फायनलमध्ये?
- हिटमॅनचा कहर! 300 षटकारांचा पराक्रम! रोहित शर्माच्या तुफानी खेळीने मुंबईचा एलिमिनेटरमध्ये धमाका
- मुंबई इंडियन्सचा ‘हिटमॅन शो’! एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव









