🕒 1 min read
राजकारणात विरोधकही कधीकधी अशा मागण्या करतात की भुवया उंचावतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा सोलापुरात आलाय. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर (Ajit Pawar Death) राजकारण तापलेलं असतानाच आता काँग्रेसने एक मोठं विधान केलंय. “लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojana) अजितदादांचं नाव दिलं तर आम्हाला आनंदच होईल,” असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
सध्या राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा (ZP Election) धुराळा उडालाय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आलेले हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी सरकारला थेट जाब विचारला. आमदार अमोल मिटकरींनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे नाव बदलून ‘अजितदादांची लाडकी बहीण’ करावं, अशी मागणी केली होती. यावर बोलताना सपकाळ म्हणाले, “सत्ता भाजपची आहे, त्यांनी खुशाल योजनेला अजितदादांचं नाव द्यावं, आम्हाला त्याचा आनंदच आहे. पण सरकारने आधी हे सांगावं की लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० ऐवजी २१०० रुपये कधी जमा होणार?”
Ladki Bahin Yojana
यावेळी सपकाळांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून (Plane Crash) गंभीर प्रश्नही उपस्थित केले. “मुंढवा जमीन घोटाळ्यात जशी पार्थ पवारांना ‘क्लीन चीट’ दिली, तशी घाई या तपासात करू नका,” असा इशाराच त्यांनी सरकारला दिलाय. अपघाताबाबत मनात संशय असून याची सखोल आणि पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.
दरम्यान, १९९९ पासून आघाडीत लढल्याने काँग्रेसची पीछेहाट झाली असून यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा सपकाळांनी दिलाय. प्रचाराच्या तोफा थंडावणार असून ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे, त्यामुळे या विधानाचे पडसाद मतपेटीतून उमटतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; ९ कोटींच्या ‘त्या’ प्रकरणामुळे कोर्टाने चांगलेच फटकारले
- गोविंदा दिवाळखोरीत? घरसुद्धा गहाण, पैशांसाठी करतोय लग्झरी कार सोडून टॅक्सीने प्रवास? मॅनेजर म्हणाला…
- भारत-पाक सामन्यावर सूर्याचं रोखठोक उत्तर; ‘त्या’ विधानाने पाकिस्तानला आरसा दाखवला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











