Share

‘देशाचे गृहमंत्री कुठे आहेत?’ संजय राऊतांचा अमित शाहांवर घणाघात

संजय राऊतांनी अमित शाह, शिंदे गट आणि बाबा रामदेव यांच्यावर गंभीर आरोप करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Published On: 

Raut-Shah

मुंबई : “देशाचे गृहमंत्री कुठे आहेत?” आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकार (Centre Govt), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), शिंदे गट (Shinde Group) आणि योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdeo) यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शाह यांनी अद्याप त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, याकडे लक्ष वेधत राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले.

‘अमित शाह यांनीच लाठीचार्जचे आदेश दिले’

जंतर-मंतर (Jantar-Mantar) येथील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा संदर्भ देत राऊत यांनी आरोप केला की, संसद मार्ग पोलीस ठाण्यातील नोंदींमध्ये या आदेशांबाबतचा तपशील उपलब्ध आहे. दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असल्याने, लाठीचार्जची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी पूर्णपणे अमित शाह यांचीच आहे, असा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी यांची अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी ही केवळ विरोधी पक्षाचीच नव्हे, तर देशातील जनतेची भावना असल्याचे राऊत यांनी नमूद केले. पुलवामा हल्ल्यानंतरही गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी होती, असे प्रतिपादन करत ते म्हणाले, “जरी गृहमंत्र्यांच्या माहितीशिवाय लाठीचार्ज झाला असेल, तरीही ती त्यांचीच जबाबदारी ठरते. त्यामुळे, दोन्ही बाबतीत तेच जबाबदार आहेत.”

राऊत यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, “ते स्वतःची मते मांडत नाहीत, त्यांना तयार केलेले भाषण वाचून दाखवावे लागते.”

शिंदे गटाच्या सुनावणीवर भाष्य

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, न्यायालय काय निर्णय देते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यांनी दावा केला, “जर निकाल संविधान आणि कायद्याच्या चौकटीत दिला गेला, तर एकनाथ शिंदे यांची साथ देणारे अपात्र ठरतील.” “शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्य-बाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष इतरांच्या हाती सोपवणे चुकीचे आहे. न्यायालयाने संविधान आणि कायदेशीर चौकटीनुसारच निकाल द्यावा. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.”

बाबा रामदेव यांच्यावर टीका

संजय राऊत यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यावरही टीका केली. “तुम्ही नेतृत्व केलेले आंदोलन हा राष्ट्राचा अपमान नव्हता का? महिलांचा वेश धारण करून आंदोलनस्थळावरून पळून गेलात, तेव्हा देशाच्या प्रतिष्ठेचे काय झाले?” असा सवाल त्यांनी केला. भविष्यात सत्तांतर झाल्यास रामदेव हे राहुल गांधींचा सत्कार करणाऱ्यांच्या रांगेत असतील, असे भाष्य करत त्यांनी रामदेव यांच्या राजकीय भूमिकेतील अस्थिरतेवर बोट ठेवले.

पुण्यातील कार्यक्रमाला आक्षेप

पुण्यात अमित शाह यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आल्याच्या वृत्तावरही राऊत यांनी आक्षेप घेतला. “गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीचा सत्कार होऊ नये. पुणेकरांनी याला विरोध केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही