Share

पंजाबराव डखांचा पावसाचा नवा अंदाज! राज्यात ‘या’ तारखेपासून मुसळधार, बळीराजाला मोठा दिलासा

राज्यात १४ ते २२ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचा नवा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Published On: 

Panjabrao Dakh weather forecast of heavy rain in Maharashtra for farmers

Weather Forecast: पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले, तरी राज्याच्या अनेक भागांत अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाची पिकं हातातून जाण्याची भीती आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यामुळे बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. अशातच आता राज्याच्या हवामान आणि कृषी क्षेत्रासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबत नवा आणि महत्त्वाचा अंदाज वर्तवला असून, लवकरच राज्याला मुसळधार पावसाची झोडपून काढण्याची शक्यता आहे.

सध्या पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता तशी कमीच आहे. मात्र, १४ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या काळात पावसाचा जोर अचानक वाढणार असून, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

Panjabrao Dakh weather forecast Maharashtra

पंजाबराव डख यांचा अंदाज: राज्यात कुठे पडणार मुसळधार पाऊस?

पंजाबराव डख यांनी ६ सप्टेंबर रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार, १३ सप्टेंबरपासून पावसाला पुन्हा सुरुवात होईल. सुरुवातीच्या टप्प्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. त्यानंतर १४ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढेल आणि १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान हा पाऊस राज्यभरात पसरेल.

दुसरीकडे, दक्षिण महाराष्ट्रासाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बारामती, फलटण, आटपाडी, पंढरपूर, सांगोला, जत आणि दौंड या पट्ट्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

या पावसामुळे केवळ पिकांनाच जीवदान मिळणार नाही, तर कोरडे पडलेले छोटे तलाव आणि बंधारेही भरण्याची शक्यता आहे. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्येही चांगला पाऊस होईल. विशेषतः मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास पाण्याची आवक वाढेल. तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम आणि हिंगोलीतही पावसाची जोरदार हालचाल पाहायला मिळेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही