🕒 1 min read
Jasprit Bumrah: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २५६ धावांचा डोंगर पार करणे न्यूझीलंडला शक्य होणार का? हाच प्रश्न आता किवी चाहत्यांना सतावू लागला आहे. कारण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी फायनलमध्ये आपला खरा जलवा दाखवण्यास सुरुवात केली आहे.
अक्षर पटेलने फिन ऍलनला बाद करून पहिले यश मिळवून दिल्यानंतर, आता भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहनेही मैदानात आग ओकली आहे. बुमराहने गोलंदाजीला येताच आपल्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा धोकादायक फलंदाज रचिन रवींद्रला स्वस्तात तंबूत पाठवले आहे.
बुमराहच्या भेदक चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रचिन रवींद्र पूर्णपणे फसला आणि विकेटच्या मागे ईशान किशनने कोणतीही चूक न करता त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. रचिनला अवघ्या १ धावेवर माघारी परतावे लागले असून किवींना हा दुसरा आणि अतिशय मोठा धक्का बसला आहे.
लागोपाठ दोन मोठे फलंदाज बाद झाल्याने न्यूझीलंडची अवस्था आता ३.२ षटकांनंतर २ बाद ३३ अशी बिकट झाली आहे. किवी संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी अजूनही १०० चेंडूंत २२३ धावांची गरज आहे.
सध्या मैदानावर टिम सिफर्ट २१ धावांवर तर ग्लेन फिलिप्स १ धावेवर खेळत आहेत. आवश्यक रनरेट (RRR) आता १३.४ वर पोहोचल्याने न्यूझीलंडवर प्रचंड दडपण आले आहे. आता या दबावाखाली बुमराह आणि कंपनी किवींना किती लवकर गुंडाळतात, हे पाहणे अक्षरशः थरारक ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ Final: टीम इंडियाची फायनलमध्ये सर्वात मोठी चूक! शिवम दुबेने सोडला फिन ऍलनचा कॅच
- IND vs NZ Final: शिवम दुबेने शेवटी काढली पिसं! दव फॅक्टर झुगारून टीम इंडियाने रचला २५५ धावांचा डोंगर
- Hardik Pandya: हार्दिक पंड्या फायनलमध्ये पूर्णपणे फ्लॉप! मॅट हेन्रीचा मोठा धक्का, टीम इंडिया संकटात?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










