🕒 1 min read
Hardik Pandya: सूर्या शून्यावर बाद झाल्यानंतर सर्वांच्या नजरा हार्दिक पंड्यावर होत्या. पण फायनलच्या दबावात त्यानेही चाहत्यांची घोर निराशा केली आहे का? हाच प्रश्न आता विचारला जात आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाची अवस्था आता अचानक कठीण झाली आहे. जेम्स नीशमच्या वादळातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारताला आता मॅट हेन्रीने अतिशय मोठा धक्का दिला आहे.
मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा हार्दिक पंड्या फायनलमध्ये मोठी खेळी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. १८ व्या षटकात मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात हार्दिकने आपली विकेट गमावली.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने त्याचा सोपा झेल टिपला आणि किवींच्या गोटात पुन्हा एकदा आनंदाची लाट उसळली. हार्दिकने आपल्या खेळीत अवघ्या १३ चेंडूंचा सामना करत फक्त १८ धावा केल्या.
या संथ आणि दबावाखाली खेळलेल्या डावात त्याला केवळ १ चौकार आणि १ षटकार ठोकता आला. संजू आणि ईशानने दिलेल्या वादळी सुरुवातीनंतर भारताचा रनरेट १४ च्या वर होता. पण आता १८.२ षटकांनंतर भारताची अवस्था ५ बाद २२६ धावा अशी झाली आहे.
सध्या मैदानावर युवा फलंदाज तिलक वर्मा ५ धावांवर खेळत आहे. दव फॅक्टरचा मोठा धोका पाहता भारताला आणखी धावांची गरज आहे. आता उरलेल्या १० चेंडूंवर टीम इंडिया न्यूझीलंडसमोर किती मोठे टार्गेट ठेवते, याकडे १ लाख ३२ हजार प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










