🕒 1 min read
IND vs NZ | अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज इतिहास रचला गेला आहे! टी-२० विश्वचषकाच्या हाय-व्होल्टेज फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला ९६ धावांनी धूळ चारत विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे. २५६ धावांच्या महाकाय लक्षाचा पाठलाग करताना किवींचा डाव अवघ्या १५९ धावांत संपुष्टात आला.
भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह. बुमराहने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १५ धावा देत किवींचे ४ मुख्य फलंदाज तंबूत धाडले. त्याला अक्षर पटेलने (२ विकेट्स) आणि अर्शदीप सिंगने मोलाची साथ दिली. न्यूझीलंडकडून केवळ टिम सिफर्टने (५२ धावा) थोडी झुंज दिली, पण भारताच्या भेदक माऱ्यासमोर इतर फलंदाजांनी नांगी टाकली.
तत्पूर्वी, फलंदाजीत संजू सॅमसनच्या ८९ धावा, ईशान किशनच्या ५४ धावा आणि अभिषेक शर्माच्या ५२ धावांच्या जोरावर भारताने ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला होता. शिवम दुबेने शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला ही धावसंख्या गाठता आली.
अभिषेक शर्माने अखेरच्या चेंडूवर जेकब डफीला बाद करत न्यूझीलंडचा शेवटचा गडी बाद केला आणि भारताच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण असून टीम इंडियाने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Jasprit Bumrah: बुमराहचा फायनलमध्ये कहर! ‘यॉर्कर किंग’ने किवींची दाणादाण उडवली, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
- Jasprit Bumrah: बुमराहचा अहमदाबादमध्ये कहर! सलग दोन चेंडूंवर दोन विकेट्स
- Tim Seifert: टीम इंडियाचा फायनलमध्ये विजय निश्चित? टिम सिफर्ट ५२ धावांवर आऊट, किवींचा अर्धा संघ तंबूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











