Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावात वाढ; इरान, सौदी आणि अमेरिकेची एन्ट्री

After the Pahalgam terror attack, tensions between India and Pakistan have escalated, prompting Iran to call for peace and restraint. Saudi Arabia and the United States have also urged both nations to resolve disputes through dialogue.

Published On: 

Pahalgam terror attack ॰ Pahalgam attack

🕒 1 min read

नवी दिल्ली, २७ एप्रिल: जम्मू काश्मीरमधील पहलगाम ( Pahalgam Terror Attack ) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावर्ती तणाव अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरही हालचाली सुरू झाल्या असून, इरानने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

इरानचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास यांनी सोशल मीडियावरून दोन्ही देशांना शांततेची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, “भारत आणि पाकिस्तान आमचे शेजारी देश आहेत आणि आमच्याशी त्यांचे दीर्घकालीन सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे.”

Pahalgam Terror Attack: Iran, Saudi Arabia, US Urge India-Pakistan to Ease Tensions

याआधी सौदी अरेबियानेही भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली होती. सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. एस. जयशंकर यांनी स्वतः ट्विटरवरून या संवादाची माहिती दिली.

दरम्यान, अमेरिकेनेही या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना जवळचे मित्र संबोधून, तणाव कमी करण्यासाठी संवाद साधावा, असे सांगितले. सध्या भारत-पाकिस्तान सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून हालचालींना वेग आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही