🕒 1 min read
नागपूर, २३ एप्रिल: काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूरमध्ये शिवसेनेने जोरदार आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी त्यांच्या फोटोंना बांगड्या दाखवत राजीनाम्याची मागणी केली. (After the Pahalgam terror attack that killed 28, including 6 from Maharashtra, Shiv Sena (UBT) launched protests in Nagpur, accusing PM Modi and Home Minister Shah of negligence and demanding their resignation.)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटले की, “गृहमंत्री देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा व्यक्तींना पदावर राहण्याचा अधिकार नाही.” त्यांनी शहा यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.
Shiv Sena Demands Modi, Shah Resignation After Pahalgam Terror Attack
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेनेही २५ एप्रिल रोजी देशव्यापी निषेध आंदोलनाची हाक दिली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. तरीही असे हल्ले होतात? असा सवाल आंदोलकांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- देश रक्तात न्हालाय, 28 मृत्यूंनंतरही IPL थांबत नाही; टीकेनंतर BCCI चा मोठा निर्णय
- काश्मीरच्या थरारात महाराष्ट्राला हादरा; पहलगाम हल्ल्यात 6 ठार, मदतीसाठी हेल्पलाइन सक्रिय
- जर शत्रू बिळात असतील, तर निष्पाप का मरतायत? मोदी-शाह कौतुकावरून एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र