Share

जर शत्रू बिळात असतील, तर निष्पाप का मरतायत? मोदी-शाह कौतुकावरून एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

After claiming “enemies are hiding in holes” under Modi-Shah leadership, Maharashtra Deputy CM Eknath Shinde faces backlash post-Pahalgam terror attack that left 28 civilians dead.

Eknath Shinde lauded the leadership of Amit Shah and PM Narendra Modi, crediting them for strengthening national security and repealing Article 370.

🕒 1 min read

ठाणे | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आले होते, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक मजबूत झाल्याचा दावा करत, “सीमेवरील शत्रू बिळात लपले आहेत,” असं वक्तव्य केलं होते. शिंदेंनी अनुच्छेद ३७० हटवण्याच्या निर्णयाचं कौतुक करताना देशातील सुरक्षास्थिती बळकट असल्याचा पुनरुच्चार केला होता.

मात्र, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर टीका केली आहे. विरोधकांचा सवाल असा आहे की, जर शत्रू बिळात असतील तर मग निष्पाप लोकं का मरत आहेत?

Eknath Shinde faces backlash post after Pahalgam terror attack

याच पार्श्वभूमीवर माजी मेजर जनरल जीडी बक्षी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. “भारतीय लष्करातील भरती थांबवून लष्कराचा आकार 1 लाख 80 हजारांनी कमी करणे, ही कोणाची ‘बुद्धिमानी’ कल्पना होती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी विचारले की, “फक्त पैसे वाचवण्यासाठी जवानांची भरती थांबवणं, आणि त्याच दरम्यान नागरिक मारले जाणं, हे स्वीकारार्ह आहे का?”

महत्वाच्या बातम्या

Youtube

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Crime Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now