📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

Ind vs SA Super 8 : टीम इंडियाचा अहमदाबादमध्ये मोठा पराभव; सेमीफायनलच्या शर्यतीत आता नवा ट्विस्ट!

टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी दारुण पराभव केला. या पराभवामुळे भारताची उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे.

Published On: 

Ind vs SA T20 World Cup: टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव!

🕒 1 min read

अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम आणि भारतीय चाहत्यांचे तुटलेले हृदय… हे दुष्टचक्र कधी थांबणार? असा प्रश्न आता प्रत्येक क्रिकेटप्रेमीला पडलाय.

२०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलची भळभळती जखम ताजी असतानाच, पुन्हा एकदा याच मैदानावर भारतीयांची घोर निराशा झाली आहे. ICC T20 World Cup 2026 च्या अत्यंत महत्त्वाच्या Ind vs SA Super 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला ७६ धावांनी चारही मुंड्या चित केलंय. लाखो प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये अक्षरशः सन्नाटा पसरला होता.

Ind vs SA T20 World Cup

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या आफ्रिकेची सुरुवात बुमराह आणि अर्शदीपने खराब केली होती. अवघ्या २० धावांत ३ बळी असा त्यांचा उडता धुव्वा उडाला होता. बुमराहने डी कॉक (६) आणि रिकेल्टनला (७) बाद केलं, तर अर्शदीपने मार्करमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांनी भारताच्या हातून सामना हिरावून घेतला.

मिलरने अवघ्या ३५ चेंडूत तुफानी ६३ धावा ठोकल्या, तर ब्रेविसने ४५ धावांची आक्रमक खेळी केली. शेवटी ट्रिस्टन स्टब्सच्या नाबाद ४४ धावांच्या झंझावाती खेळीमुळे आफ्रिकेने १८७ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून बुमराहने सर्वाधिक ३, तर अर्शदीपने २ बळी घेतले.

१८८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. पॉवरप्लेमध्येच ३१ धावांवर ३ विकेट्स गेल्याने भारताचा डाव सावरलाच नाही. ईशान किशन शून्यावर आऊट झाला, तर तिलक वर्मा आणि अभिषेक शर्माही स्वस्तात परतले. मधल्या फळीत वॉशिंग्टन सुंदर (११) आणि हार्दिक पांड्या (१८) यांनीही पूर्णपणे निराशा केली.

संपूर्ण डावात फक्त शिवम दुबेने ३७ चेंडूत ४२ धावांची एकाकी झुंज दिली. पण संपूर्ण संघ अवघ्या १११ धावांवर गारद झाला. या दारुण पराभवाने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून टीम इंडियाची सेमीफायनलची वाट आता बिकट झाली आहे. पुढचे झिम्बाब्वे (२६ फेब्रुवारी, चेन्नई) आणि वेस्ट इंडिज (१ मार्च, कोलकाता) विरुद्धचे सामने आता भारतासाठी ‘करो या मरो’ असणार आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!