🕒 1 min read
IND vs NZ Final: रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकेल का? हा प्रश्न आता पूर्णपणे मागे पडलाय. कारण रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या महामुकाबल्यात न्यूझीलंडचा कर्दनकाळ ठरणारे ३ नवे ‘मॅच विनर्स’ भारताला मिळाले आहेत.
पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे ‘संजू सॅमसन’. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये या पठ्ठ्याने अवघ्या ४२ चेंडूंत ८९ धावा कुटून जगाला आपली ताकद दाखवून दिली. संजू सध्या ज्या भयंकर फॉर्ममध्ये आहे, ते पाहता फायनलमध्ये तो किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढू शकतो.
दुसरा हुकमी एक्का म्हणजे ‘जसप्रीत बुमराह’. न्यूझीलंडचा फिन ऍलन सध्या ३३ चेंडूंत नाबाद १०० धावा ठोकून हवेत उडतोय. पण त्याला जमिनीवर आणण्याची ताकद फक्त बुमराहच्या अचूक यॉर्करमध्ये आहे. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये बुमराहने एक-दोन विकेट्स काढल्या, तर अर्धी मॅच तिथेच टीम इंडियाच्या खिशात येईल.
आणि तिसरा सर्वात मोठा ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो तो म्हणजे फिरकीचा जादूगार ‘कुलदीप यादव’. अहमदाबादच्या लाल मातीवर जर चेंडूने टर्न घेतला, तर कुलदीप न्यूझीलंडच्या आक्रमक फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवेल. वरुण चक्रवर्ती महागडा ठरल्यामुळे कुलदीपला फायनलमध्ये मोठी संधी मिळू शकते.
आता हे तीन वाघ रविवारी १ लाख ३२ हजार प्रेक्षकांसमोर कसा धुमाकूळ घालतात आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात इतिहास रचतात का, हे पाहण्यासाठी संपूर्ण देश श्वास रोखून वाट पाहत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ Final: अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोठा सस्पेन्स! लाल की काळ्या मातीवर रंगणार महासंग्राम?
- IND vs NZ Final: पावसामुळे मॅच रद्द झाली तर विजेता कोण? ICC च्या नव्या नियमाने उडवली झोप!
- सूर्यकुमार यादवची मोठी खेळी! IND vs NZ Final च्या ‘प्लेईंग ११’ मधून २ स्टार खेळाडूंचा पत्ता कट?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











