दिल्ली : सोमवारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) जंतर-मंतर ते संसद भवनापर्यंत काढलेला मोर्चा राजधानीत अलीकडच्या काळात झालेल्या सर्वात हिंसक निदर्शनांपैकी एक ठरला. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, यात ‘स्पेशल कमिशनर ऑफ पोलीस’ दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ११८ हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके (Abhijit Dipke) यांनी सोमवारी रात्री उशिरा सांगितले की, संसद भवनाकडे जाणारा मोर्चा मंगळवारीही सुरूच राहील. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिपके यांनी हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
सोमवारी उभारलेला मंच दिल्ली पोलिसांनी हटवल्याचा आरोप करत CJP चे आंदोलक जंतर-मंतरवर परतले. संसद भवनाकडे मोर्चा काढण्याबाबत विचारले असता दिपके म्हणाले, “आम्ही पुन्हा मोर्चा काढू. आम्ही आंदोलनस्थळ सोडणार नाही.”
परीक्षांमधील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा ‘संसद मोर्चा’ आयोजित केला होता. मात्र, या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यात अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर, जमावाला हटविण्यासाठी लाठीचार्ज, पोलिसांच्या बसेसच्या खिडक्यांची तोडफोड आणि ७० हून अधिक लोकांना ताब्यात घेणे यांसारख्या घटना घडल्या. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- धर्मेंद्र प्रधान–अमित शाह यांची 3 तास बैठक; CJP आंदोलनावर मोठी रणनीती?
- ‘विश्वगुरू झुरळांना घाबरतात’; CJP आंदोलनावरून सुषमा अंधारेंचा केंद्र सरकारवर घणाघात
- CJP आंदोलनाची सरकारने घेतली दखल; जे. पी. नड्डांचे मोठे आश्वासन; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












