🕒 1 min read
IND vs NZ Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज खरोखरच धावांचा पाऊस पडणार की काय? फायनलच्या महामुकाबल्यात टीम इंडियाने अवघ्या ८ षटकांत ११० धावांचा टप्पा ओलांडून न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली आहेत.
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच किवी गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. दव फॅक्टरची चिंता न करता अभिषेक शर्माने फायनलच्या दबावाला झुगारून देत वादळी खेळी केली.
अभिषेकने किवी गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या २१ चेंडूंत ५२ धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी साकारली. या तुफानी डावात त्याने तब्बल ६ कडक चौकार आणि ३ उत्तुंग षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट २४७ च्या घरात होता!
अखेर रचिन रवींद्रने आठव्या षटकात न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. टिम सिफर्टकडे कॅच देऊन अभिषेक शर्मा तंबूत परतला, पण तोपर्यंत त्याने टीम इंडियासाठी एक भक्कम पाया रचून दिला होता.
अभिषेक बाद झाल्यानंतर आता तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशन मैदानात आला आहे. त्यानेही येताच आक्रमक पवित्रा घेत अवघ्या ५ चेंडूंत १२ धावा ठोकत आपला इरादा स्पष्ट केला आहे.
दुसऱ्या बाजूला संजू सॅमसन अतिशय संयमी पण वेगवान खेळी करत २२ चेंडूंत ३८ धावांवर नाबाद खेळत आहे. ८ षटकांनंतर टीम इंडियाचा रनरेट सध्या १३.८ इतका जबरदस्त आहे. आता सूर्याची सेना न्यूझीलंडसमोर किती मोठा धावांचा डोंगर उभा करते, याकडे १ लाख ३२ हजार प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi Stadium: मोदी स्टेडियम टीम इंडियासाठी ‘पनवती’? सोशल मीडियावर चाहत्यांची वाढली धडधड!
- IND vs NZ Final: सूर्याचा मोठा जुगार! फायनलची Playing 11 जाहीर, न्यूझीलंडने टाकली गुगली
- IND vs NZ Final: सूर्याचा सर्वात मोठा जुगार! फायनलच्या ‘प्लेईंग ११’ मध्ये केला नाही एकही बदल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










