Share

Anil Bonde | विरोधकांना बोलण्यासाठी नाक राहिलं नाही; अनिल बोंडेंची शरद पवारांवर खोचक टीका

🕒 1 min readAnil Bonde | अमरावती: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले आहे. तर या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवला होता. या निर्णयावरून शरद पवार यांनी देखील सरकारवर टीका केली होती.Related News for Youपवारांनी धोक्याची घंटा वाजवली; भारताच्या ‘त्या’ निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट?“मला आयुष्यभर … Read more

Published On: 

🕒 1 min read

Anil Bonde | अमरावती: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले आहे.

तर या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवला होता. या निर्णयावरून शरद पवार यांनी देखील सरकारवर टीका केली होती.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीकेवर भाजप खासदार अनिल भोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांना बोलायला नाक उरलं नाही, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले, “शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी कांदा निर्यातीवर बंदी आणली होती. मात्र केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी आणलेली नाही.

सरकारनं फक्त कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावला आहे. शेतकऱ्यांना हा निर्णय पटला नाही म्हणून केंद्र सरकारनं लगेच तोडगा काढत 2 लाख मेट्रिक टन कांदा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

2410 रुपयांनी केंद्र सरकार हा कांदा खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची सरकारने पूर्णपणे काळजी घेतली आहे.”

Sharad Pawar has not done any good work for farmers – Anil Bonde

पुढे बोलताना ते (Anil Bonde) म्हणाले, “शरद पवार कृषि मंत्री असताना कांद्याबाबत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यावेळी त्यांनी कांदा निर्यातीवर बंदी लागू केली होती.

मात्र आत्ता सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घातलेली नाही. सरकारनं फक्त कांदा निर्यातीवर 40 टक्के कर लावला आहे. त्यामुळे खरंतर विरोधकांना बोलण्यासाठी नाक राहिलेले नाही.

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी त्यांच्या काळात कोणतंही चांगलं काम केलं नाही आणि शरद पवार हे विसरले आहे. त्यावेळी शरद पवारांनी कापसाची निर्यात थांबवली होती आणि कांद्याची निर्यात बंद केली होती. या गोष्टी शरद पवार विसरले असतील.”

दरम्यान, या मुद्द्यावरून शरद पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले, ” 2410 रुपये प्रति क्विंटल भावाने सरकार कांदा खरेदी करणार आहे.

मात्र, ही किंमत खूप कमी आहे. सरकारनं 4000 प्रतिक्विंटल रुपयांनी कांदा खरेदी करायला हवा. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण न करणारा आहे. त्याचबरोबर 2410 रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!