Share

Jayant Patil | तलाठी भरती परीक्षेतील गोंधळाची STI चौकशी करा; जयंत पाटलांची राज्य शासनाला मागणी

🕒 1 min read Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: 21 ऑगस्ट 2023 रोजी राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तर याआधी देखील नाशिकमध्ये परीक्षाबाबत असाच धक्कादायक प्रकार घडला होता. या सर्व घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होताना दिसत आहे. Related … Read more

Published On: 

🕒 1 min read

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: 21 ऑगस्ट 2023 रोजी राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

तर याआधी देखील नाशिकमध्ये परीक्षाबाबत असाच धक्कादायक प्रकार घडला होता. या सर्व घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे मागणी एक केली आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना या संदर्भात पत्र पाठवलं आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विट करत ते म्हणाले, “तलाठी भरती परीक्षेच्या दरम्यान डाऊन झालेले सर्व्हर, पहिल्याच दिवशी झालेले पेपर फुटण्याचे प्रकरण, म्हाडा भरती परीक्षा प्रक्रियेत झालेले गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे घडत आहेत.

यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय यांना या सर्व प्रकरणांची SIT मार्फत चौकशी करत दोषींवर कारवाई करावी.

तसेच अशा घटना पुन्हा घडू नये आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्र शासनाच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या धर्तीवर स्वतंत्र आयोग किंवा MPSC मध्ये स्वतंत्र विभाग निर्माण करावा अशी मागणी केली.

It affects the mentality of students who study honestly – Jayant Patil 

दरम्यान, जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र पाठवलं आहे. “भरती परीक्षेदरम्यान अनेक जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर सर्व्हर बंद पडल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली असून परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात येत असल्याचे प्रकार देखील घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

तर माढा भरतीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या 60 आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असून त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे.

सरकारने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे”, असं जयंत पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही