🕒 1 min read
मुंबई – वयाच्या १५ व्या वर्षी तुम्ही-आम्ही काय करत होतो? बहुधा शाळेच्या किंवा दहावीच्या अभ्यासाचं टेन्शन घेत असू. पण बिहारच्या एका १५ वर्षांच्या पोराने थेट आयपीएलच्या मंचावर भल्याभल्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडलाय.
आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने धावांचा पाऊस पाडलाय. त्याच्या या स्फोटक फलंदाजीची दखल आता थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतली असून, लवकरच हा पठ्ठ्या टीम इंडियात दिसणार का, या चर्चांना उधाण आलंय.
Vaibhav Suryavanshi Team India entry BCCI official statement
आयपीएल स्पर्धेच्या सांगता समारोपानंतर बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी वैभववर भरभरून स्तुतिसुमने उधळली आहेत. सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या आरसीबी संघाचं कौतुक करत असतानाच, त्यांनी वैभवच्या भविष्याबाबत एक मोठं विधान केलं आहे.
सैकिया यांनी स्पष्ट केलं की, “वैभव हा अत्यंत प्रतिभावान आणि उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. या पोराला क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचवण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करेल.”
वैभवने या हंगामात तब्बल २३७.३० च्या अफाट स्ट्राईक रेटने फलंदाजी करत गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. त्याने हंगामात सर्वाधिक ७७६ धावा कुटत मानाची ‘ऑरेंज कॅप’ स्वतःच्या नावावर केली आहे. यापूर्वी २०२५ मध्ये २३ वर्षीय साई सुदर्शनने सर्वात तरुण ऑरेंज कॅप विजेता होण्याचा मान मिळवला होता, तो विक्रम आता वैभवने मोडीत काढलाय.
त्यामुळेच आता ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’चा मानकरी ठरलेला हा युवा स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांसोबत टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत कधी दिसणार, याचीच उत्सुकता तमाम क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र; विरोधकांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!
- महायुतीला रामदास आठवलेंचा थेट इशारा! ‘ते’ एक ट्विट आणि राजकारणात उडाली मोठी खळबळ
- तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सेलिब्रिटींवरही होणार थेट कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












