🕒 1 min read
मुंबई – सरकारच्या एखाद्या महत्त्वाकांक्षी योजनेतून अचानक ८० लाख लोकांची नावे कमी झाली तर काय होईल? सध्या महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ योजनेच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल ८० लाख महिलांना आता प्रशासनाने अपात्र ठरवलंय. त्यांचे दर महिन्याला मिळणारे १५०० रुपये अचानक बंद झाल्याने विरोधकांनी थेट सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana
या सगळ्या गोंधळावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शब्दांत सरकारची बाजू मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की, कोणत्याही खऱ्या आणि पात्र बहिणीला योजनेतून जाणीवपूर्वक वगळलेलं नाही.
ज्या महिलांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि ज्या सरकारच्या निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांनाच अपात्र ठरवण्यात आलंय. सुरुवातीला ही योजना सुरू करताना फक्त ‘सेल्फ सर्टिफिकेशन’वर पैसे दिले गेले. कारण, तेव्हाच जर कागदपत्रांची पडताळणी करत बसलो असतो, तर त्यात दीड वर्ष गेलं असतं, असं फडणवीसांनी सांगितलं.
दुसरीकडे, तब्बल ४ ते ५ लाख लाभार्थी असे सापडलेत, ज्यांच्याकडे चक्क चारचाकी गाड्या आहेत. नियमानुसार घरात चारचाकी गाडी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
जनतेच्या पैशांचा हिशोब ‘कॅग’ला (CAG) द्यावा लागतो, त्यामुळे पडताळणी करणं भागच होतं. तरीही, जर कुणा पात्र महिलेला वाटत असेल की आपल्यावर अन्याय झालाय, तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ‘केवायसी’ची खिडकी उघडण्याची सरकारची पूर्ण तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही.
📌 महत्वाच्या बातम्या
- महायुतीला रामदास आठवलेंचा थेट इशारा! ‘ते’ एक ट्विट आणि राजकारणात उडाली मोठी खळबळ
- तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या सेलिब्रिटींवरही होणार थेट कारवाई
- १५ व्या वर्षी ‘ऑरेंज कॅप’ जिंकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने असा काय गौप्यस्फोट केला की दिग्गजांचेही डोळे उघडले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












